शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

साधू-महंतांमध्येच राजकारण रंगले

By admin | Updated: February 24, 2015 02:06 IST

साधू-महंतांमध्येच राजकारण रंगले

नाशिक : कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या मिरवणूक मार्गात काहीसा बदल करण्यावरून आता साधू-महंतांमध्येच राजकारण रंगले आहे. पालकमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत नवीन मार्ग स्वीकारण्यास मूक संमती देणाऱ्या स्थानिक साधू-महंतांनी गेल्या आठवड्यात अचानक घूमजाव केले आणि पारंपरिकच शाहीमार्ग कायम ठेवावा, अशी मागणी केली. गेल्या आठवड्यातील या बदललेल्या भूमिकेसंदर्भात आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी संताप व्यक्त केला आहे आणि आता अगोदर घेतलेल्या मार्गात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. कुंभमेळ्यातील पर्वणीच्या दिवशी पंचवटीतील तपोवनातून साधू- महंतांच्या आखाड्यांची मिरवणूक निघते. ही मिरवणूक रामकुंडाकडे जात असली तरी मध्ये अनेक ठिकाणी अरुंद मार्ग आहे. बारा वर्षांपूर्वी भरलेल्या कुंभमेळ्यात अशाच प्रकारे मिरवणूक सुरू असताना सरदार चौकात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात २८ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पारंपरिक शाहीमार्गात काहीसा बदल न करता ती सरदार चौकाकडे न आणता गणेशवाडी भागातून गाडगे महाराज पुलाखाली मिरवणूक आणावी आणि तेथून थेट रामकुंडावर मिरवणूक न्यावी असा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव होता. गेल्या महिन्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत साधू-महंतांची कुंभमेळ्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी महंत ग्यानदास यांनी गणेशवाडीतून पर्यायी मार्ग नेण्यास तयारी दर्शविली होती. त्यामुळे सरदार चौकात रुंदीकरण न झाल्याने चिंतित असलेल्या जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु गेल्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मात्र स्थानिक महंतांनी अचानक घूमजाव केले. विशेषत: दिंगबर आखाड्यानेही नव्या शाहीमार्गास विरोध केला आणि पारंपरिक शाहीमार्गात बदल होणार नाही, असे निक्षूण सांगितले. आणि एकप्रकारे स्थानिक महंतांनी महंत ग्यानदास यांच्या विरोधात बंड पुकारल्याचे दिसत नाही.गेल्याच महिन्यात झालेल्या बैठकीत महंत ग्यानदास यांच्या भूमिकेविषयी चकार शब्द न काढणाऱ्या स्थानिक महंतांनी अशाप्रकारे घूमजाव केल्याने जिल्हा प्रशासन संभ्रमात पडले आहे, तर महंत ग्यानदास संतप्त झाले आहेत. स्थानिक पातळीवर भूमिका घेणाऱ्या उपमहंतांना अशाप्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मला त्यांनी सर्वाधिकार दिल्यानेच मी निर्णय घेतला असून, काहीही झाले तरी गणेशवाडीतील बदललेल्या मार्गावरूनच शाही मिरवणूक पार पडेल, असे त्यांनी निक्षूण सांगितले. (प्रतिनिधी)