शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणी हरले, राजकारणी जिंकले ! 

By श्याम बागुल | Updated: November 2, 2018 14:24 IST

दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात टिकेचे धनी व्हावे लागले होते.

ठळक मुद्देअखेर पाणी सोडावे लागले : सारेच गप्प बसले

श्याम बागुलनाशिक : जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातील पाणी सोडण्यासाठी पंधरा दिवसांपुर्वी सर्वच पक्षांनी एकत्र येवून बांधलेली मोट किती फसवी व सोयाीसोयीची होती हे अखेर धरणातून पाणी सोडल्यानंतर स्पष्ट झाले आहे. पाण्याच्या प्रश्नाची राजकीय सांगड घालत निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला एकाकी पाडण्याची केलेली खेळी जशी गंगापूरचे पाणी वाचवून भाजपाने विरोधी पक्षांवर उलटवली, त्याच प्रमाणात गंगापूरच्या बदल्यात मुकेणेचे पाणी जायकवाडीला सोडल्यामुळे भाजपाचाही पुर्ण विजय या लढ्यात झाला नसल्याचे दिसून आले आहे.दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात टिकेचे धनी व्हावे लागले होते. खुद्द जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची गाडी रोखून त्यांच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांचा यंदा मात्र घसा बसला. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाला एकटे पाडणाºया विरोधी पक्षांवर यंदाच्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मात केली व जायकवाडीसाठी पाणी न सोडण्याच्या विरोधातील आंदोलनात सर्व प्रथम फरांदे यांनी उडी घेवून सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मित्रपक्ष शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसेने पुर्ण सहकार्य केले असले तरी, त्यांचे एकत्र येणे हे देखील निव्वळ प्रसिद्धीचा फंडा होता हे त्यानंतरच्या काळातील सरकार व न्यायालयीन लढाईच्या दरम्यान स्पष्ट झाले. फरांदे यांनी न्यायालयीन लढाईत आपली सक्रीयता दर्शविली त्याच बरोबर जलसंपत्ती प्राधिकरण, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ, जलसंपदामंत्र्यांकडे पाठपुरावा करून गंगापूर धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यावर स्थगिती मिळवून बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांचा पाणी सोडण्याला होणारा विरोध किती तकलादू व दिखावू होता हे स्पष्ट झाले. भाजपाने गंगापूरचे पाणी वाचविले असले तरी, त्या मोबदल्यात मुकणे धरणातून तितकेच पाणी दारणाधरणमार्गे सोडावे लागणार आहे. त्यामुळे गंगापूरचे पाणी वाचवून राजकारणी जिंकले असले तरी, जायकवाडीला पाणी सोडावेच लागणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणी पाण्याची लढाई हरले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक