शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय श्रेयवादास सुरुवात

By श्याम बागुल | Updated: July 25, 2019 19:14 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जोमाने सुरुवात झाल्या असून, विद्यमान प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघाची बांधणी करण्यात व्यस्त झाले आहेत.

ठळक मुद्देसत्ताधारी, विरोधक अग्रेसर : भूमिपूजने, लोकार्पणे जोरातविकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणाची घाई

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांकडून मतदारसंघातील कामांचे श्रेय घेण्यास सुरुवात झाली असून, त्यानिमित्ताने निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापायला लागले आहे. या श्रेयवादात कोणाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तर पाण्याच्या प्रश्नाची आठवण होऊ लागली असून, त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जोमाने सुरुवात झाल्या असून, विद्यमान प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघाची बांधणी करण्यात व्यस्त झाले आहेत. त्यासाठी त्यांना मतदारसंघातील प्रश्नांची व समस्यांचीही आठवण होऊ लागली आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर केलेले प्रयत्न व त्याला मिळालेले यशाचे गोडवेही समर्थकांकडून गायले जात आहेत. त्यातूनच कामांचे श्रेय घेण्याची चढाओढ लागली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दोनच दिवसांपूर्वी मतदारसंघातील सूत गिरणीकडे जिल्हा बॅँकेचे थकलेल्या कर्जाच्या विषयावरून ठिय्या आंदोलन केले. या थकीत कर्जाच्या निमित्ताने भुसे यांनी थकबाकीदार असलेल्या प्रतिस्पर्धी हिरे कुटुंबीयांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे माकपाचे आमदार जिवा पांडू गावित यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी कळवण येथे आदिवासी, शेतकऱ्यांचा मोर्चा काढून दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या दरबारी मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी या विषयांबरोबरच, सटाणा शहराला थेट जलवाहिनीने पाणीपुरवठा करणाºया योजनेला विरोधही केला आहे. येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनीदेखील मांजरपाडा प्रकल्पाचे विधानसभा निवडणुकीपूर्वी जलपूजन आयोजित केले आहे. गुजरातला जाणारे महाराष्टÑाचे पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून अडवून दिंडोरी, चांदवड, निफाड, नांदगाव, येवला या मतदारसंघांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाल्याचे सांगायला भुजबळ विसरले नाहीत. आघाडी सरकारच्या काळात काम सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम युती सरकारच्या काळात पूर्ण झाले असले तरी, भुजबळ यांनी जलपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचे पाहून सत्ताधारी पक्षानेही आता शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जलपूजनाचे आयोजन केले आहे. अन्य आमदारांकडून आपापल्या मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणाची घाई सुरू झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक