शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोहन भागवत, PM मोदी शस्त्रपूजा करतात, सरकार ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का?”: आंबेडकर
2
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
5
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
6
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
7
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
8
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
9
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
10
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
11
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
12
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
13
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
14
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
15
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
18
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
19
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
20
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?

दर्जेदार रस्त्यांसाठी धोरण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:36 IST

रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी शासनाने रस्ते विकासाचे धोरण बदलत दीर्घकाल रस्ते चांगले राहावे यासाठी धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुाुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनतेची खड्ड्यांतून कायमस्वरूपी मुक्तता होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : अवनखेड येथे शेतकरी मेळावा; रस्ता कामाचे भूमिपूजन

दिंडोरी : रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी शासनाने रस्ते विकासाचे धोरण बदलत दीर्घकाल रस्ते चांगले राहावे यासाठी धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुाुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनतेची खड्ड्यांतून कायमस्वरूपी मुक्तता होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.नाशिक-वणी-कळवण-नामपूर या रस्त्याचे काम हायब्रीड अन्युईटी कार्यक्रमांतर्गत होणारअसून, सदर कामाचे भूमिपूजन व अवनखेड येथे विविध विकासकामांचे उद्घाटन बांधकाममंत्री पाटीलयांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन होते.पुढे बोलताना बांधकाम मंत्री पाटील यांनी, केंद्र सरकारने राज्यातील विविध महामार्गांना मोठ्या प्रमाणात निधी दिला, तर राज्य सरकारनेही राज्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला आहे, असे सांगत अवनखेड येथील विकासकामांबद्दल त्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सरपंच नरेंद्र जाधव यांच्या कामाचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचेही भाषण झाले. सरपंच नरेंद्र जाधव यांनी स्वागत केले.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पगारे यांनी प्रास्ताविक केले. भाजयुमोतर्फेतालुकाध्यक्ष योगेश बर्डे यांनी स्वागत केले.यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जे.पी.गावित, भाजपाचे लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाध्यक्ष संजय कावळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, महिला जिल्हाध्यक्ष मंदा पारख, उपसरपंच विजय पिंगळ, रणजित देशमुख, दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे, भास्कर कराटे, दत्तात्रय जाधव, काका देशमुख, विलास देशमुख, प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, मुख्य अभियंता हेमंत पगारे, उपविभागीय अभियंता यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, शिवाजी पिंगळ, संपत पिंगळ, तुषार घोरपडे, फारु ख बाबा, सचिन बर्डे, साजन पगारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बापू पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कमी निधीत होणार जास्त कामेपूर्वीच्या सरकारच्या काळात रस्ते झाले की वर्षात त्यावर खड्डे पडायचे व पुन्हा रस्त्याचे कामे व्हायचे; पण आताच्या सरकारने त्यात बदल केला आहे. चाळीस टक्के खर्च सरकार करणार असून, उर्वरित खर्च ठेकेदाराला करावा लागणार आहे. त्यामुळे कमी निधीत जास्त कामे होणार आहेत. भूसंपादनाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावले जातील, असे सांगत राज्यात दुष्काळी परिस्थिती असून टंचाईग्रस्त तालुके जाहीर करण्यात आले आहे. पुन्हा आढावा घेऊन जे गावे टंचाईग्रस्त आहे त्यांना टंचाईग्रस्त म्हणून घोषित करत उपाययोजना केल्या जातील असे पाटील यांनी म्हणाले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील