शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दर्जेदार रस्त्यांसाठी धोरण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:36 IST

रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी शासनाने रस्ते विकासाचे धोरण बदलत दीर्घकाल रस्ते चांगले राहावे यासाठी धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुाुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनतेची खड्ड्यांतून कायमस्वरूपी मुक्तता होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : अवनखेड येथे शेतकरी मेळावा; रस्ता कामाचे भूमिपूजन

दिंडोरी : रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी शासनाने रस्ते विकासाचे धोरण बदलत दीर्घकाल रस्ते चांगले राहावे यासाठी धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुाुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनतेची खड्ड्यांतून कायमस्वरूपी मुक्तता होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.नाशिक-वणी-कळवण-नामपूर या रस्त्याचे काम हायब्रीड अन्युईटी कार्यक्रमांतर्गत होणारअसून, सदर कामाचे भूमिपूजन व अवनखेड येथे विविध विकासकामांचे उद्घाटन बांधकाममंत्री पाटीलयांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन होते.पुढे बोलताना बांधकाम मंत्री पाटील यांनी, केंद्र सरकारने राज्यातील विविध महामार्गांना मोठ्या प्रमाणात निधी दिला, तर राज्य सरकारनेही राज्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला आहे, असे सांगत अवनखेड येथील विकासकामांबद्दल त्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सरपंच नरेंद्र जाधव यांच्या कामाचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचेही भाषण झाले. सरपंच नरेंद्र जाधव यांनी स्वागत केले.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पगारे यांनी प्रास्ताविक केले. भाजयुमोतर्फेतालुकाध्यक्ष योगेश बर्डे यांनी स्वागत केले.यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जे.पी.गावित, भाजपाचे लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाध्यक्ष संजय कावळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, महिला जिल्हाध्यक्ष मंदा पारख, उपसरपंच विजय पिंगळ, रणजित देशमुख, दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे, भास्कर कराटे, दत्तात्रय जाधव, काका देशमुख, विलास देशमुख, प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, मुख्य अभियंता हेमंत पगारे, उपविभागीय अभियंता यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, शिवाजी पिंगळ, संपत पिंगळ, तुषार घोरपडे, फारु ख बाबा, सचिन बर्डे, साजन पगारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बापू पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कमी निधीत होणार जास्त कामेपूर्वीच्या सरकारच्या काळात रस्ते झाले की वर्षात त्यावर खड्डे पडायचे व पुन्हा रस्त्याचे कामे व्हायचे; पण आताच्या सरकारने त्यात बदल केला आहे. चाळीस टक्के खर्च सरकार करणार असून, उर्वरित खर्च ठेकेदाराला करावा लागणार आहे. त्यामुळे कमी निधीत जास्त कामे होणार आहेत. भूसंपादनाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावले जातील, असे सांगत राज्यात दुष्काळी परिस्थिती असून टंचाईग्रस्त तालुके जाहीर करण्यात आले आहे. पुन्हा आढावा घेऊन जे गावे टंचाईग्रस्त आहे त्यांना टंचाईग्रस्त म्हणून घोषित करत उपाययोजना केल्या जातील असे पाटील यांनी म्हणाले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील