शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

द्राक्ष व्यापाऱ्यांची पोलीस करणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 01:10 IST

नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची परराज्यांतील किंवा परजिल्ह्यांतील व्यापाºयांकडून होणाºया आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढचे पाऊल टाकले आहे. परराज्यांतील व्यापाºयांची माहिती संबंधित बाजार समिती संचालकांसह त्या गावच्या पोलीसपाटलाने जवळच्या पोलीस ठाण्यात विहित नमुना अर्जात भरून देणे बंधनकारक असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देआरती सिंह : पोलीसपाटील, बाजार समित्यांकडून मागविणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची परराज्यांतील किंवा परजिल्ह्यांतील व्यापाºयांकडून होणाºया आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढचे पाऊल टाकले आहे. परराज्यांतील व्यापाºयांची माहिती संबंधित बाजार समिती संचालकांसह त्या गावच्या पोलीसपाटलाने जवळच्या पोलीस ठाण्यात विहित नमुना अर्जात भरून देणे बंधनकारक असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.द्राक्ष, कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेकदा शेतकºयांची परराज्यांतून लिलावासाठी आलेल्या व्यापाºयांकडून आर्थिक फसवणूक केली जाते. यापूर्वी अशाप्रकारच्या घटना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये घडल्या आहेत. यामुळे पोलिसांनी सजग होऊन यंदा पोलीसपाटील व बाजार समित्यांकडून अशा बाहेरगावांहून येणाºया व्यापाºयांची माहिती मागविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यंदा परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा शेतमालाला बसल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगाम तोंडावर आला असून, कुठल्याही प्रकारे बनावट व्यापाºयांकडून शेतकºयांची आर्थिक फसवणूक होऊ नये, म्हणून लवकरच बाहेरगावाहून आलेल्या व्यापाºयांची माहिती संकलित करून त्यांची पडताळणी सुरू क रणार असल्याचे सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आठवडाभरात माहिती नमुना अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सर्व पोलीस ठाण्यांमार्फत पोलीसपाटील व महत्त्वाच्या बाजार समित्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या नमुन्यात बाहेरगावांसह परराज्यांतून शेतमाल खरेदीसाठी आलेल्या व्यापाºयांची योग्य ती माहिती भरून पोलीस ठाण्यात जमा करणे अनिवार्य राहणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस संबंधित व्यापाºयांची पार्श्वभूमी तपासणार असून, गुन्हेगारी स्वरूपाची वृत्ती असलेल्या व्यापाºयांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे सिंह म्हणाल्या. व्यवहाराबाबत सजग रहावेशेतकºयांनी व्यापाºयांच्या आमिषाला बळी न पडता आपला व्यवहार अधिक पारदर्शक व सजगपणे करून संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. संशयास्पद व्यापारी व त्यांचे आमिषाबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, जेणेकरून शेतकरी बांधवांची आर्थिक फसवणुकीला आळा घालणे शक्य होईल, असे आरती सिंह यांनी सांगितले. पोलीसपाटील, बाजार समित्यांकडून परराज्यांतील शेतकºयांची माहिती पोलिसांपर्यंत देणे बंधनकारक आहे, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी