शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:19 IST

समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.

ठळक मुद्देशुभवर्तमान : महिला सुरक्षा विभागाचे यश; सुशिक्षितांमध्ये वाढता कौटुंबिक कलह

नाशिक : समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.सुशिक्षित समाजाचे विचार प्रगल्भ होत जातात, हे अगदी खरे आहे. मात्र काहींवर पारंपरिक विचारांचा पगडा असल्यामुळे शहरात अनेकविध सुशिक्षित कुटुंबांमधील कलह चव्हाट्यावर येतात. कुटुंबाची बसलेली घडी विस्क टली जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून शरणपूररोड येथील सिग्नलजवळ महिला सुरक्षा विभाग पोलीस आयुक्तालयाकडून कार्यान्वित करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कौटुंबिक कलह व त्यामधून दोन कुटुंबांच्या नातेसंबंधात आलेले वितुष्ट कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न महिला पोलीसअधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केला जातो मागील वर्षभरात ६५० पीडित महिलांकडून तक्रारींचे अर्ज महिला सुरक्षा विभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार महिलेचे सासर व माहेरच्या नातेवाइकांना बोलावून घेत त्यांची गाºहाणी समजून घेतली गेली तसेच पती-पत्नीलाही बोलावून त्यांचे स्वतंत्ररीत्या म्हणणे ऐकून घेत दोन्ही बाजूंच्या लोकांचा खास करून पती-पत्नीचे समुपदेशनावर अधिकाधिक भर देत एकमेकांविषयी झालेले गैरसमज दूर करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केलाजातो.महिलांना कायद्याचे सामान्यज्ञानशहरात शिक्षणाचे प्रमाण चांगले असून, महिला आपले हक्क, कर्तव्यांबाबत सजग असून, त्यांच्यामध्ये महिला सुरक्षाविषयक कायद्यांचे सामान्यज्ञानही दिसून येत असल्याचे डौले यांनी सांगितले. त्यामुळे समुपदेशन करताना फारशा अडचणी उद्भवत नाहीत. प्राप्त झालेल्या ६५० अर्जांपैकी बहुतांश अर्ज हे सुशिक्षित कुटुंबांचे आहेत.अशी आहेत कारणेमहिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे, शारीरिक तक्रारी, वंध्यत्वाची समस्या, माहेरून पैशांची मागणी, मुलींचाच होणारा जन्म, पतीची व्यसनाधिनता, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान नसणे अशी अनेकविध कारणे वैवाहिक जोडप्यांच्या कलहामागील असल्याचे समोर आले आहे. अनेकदा गैरसमजुतींमधून व न्यूनगंडापोटी पती-पत्नी किंवा त्यांच्या नातेवाइकांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन नातेसंबंधधोक्यात सापडतात.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFamilyपरिवार