शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
4
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
5
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
6
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
7
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
8
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
9
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
10
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
11
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
12
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
13
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
14
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
15
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
16
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
17
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
18
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
19
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:19 IST

समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.

ठळक मुद्देशुभवर्तमान : महिला सुरक्षा विभागाचे यश; सुशिक्षितांमध्ये वाढता कौटुंबिक कलह

नाशिक : समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.सुशिक्षित समाजाचे विचार प्रगल्भ होत जातात, हे अगदी खरे आहे. मात्र काहींवर पारंपरिक विचारांचा पगडा असल्यामुळे शहरात अनेकविध सुशिक्षित कुटुंबांमधील कलह चव्हाट्यावर येतात. कुटुंबाची बसलेली घडी विस्क टली जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून शरणपूररोड येथील सिग्नलजवळ महिला सुरक्षा विभाग पोलीस आयुक्तालयाकडून कार्यान्वित करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कौटुंबिक कलह व त्यामधून दोन कुटुंबांच्या नातेसंबंधात आलेले वितुष्ट कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न महिला पोलीसअधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केला जातो मागील वर्षभरात ६५० पीडित महिलांकडून तक्रारींचे अर्ज महिला सुरक्षा विभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार महिलेचे सासर व माहेरच्या नातेवाइकांना बोलावून घेत त्यांची गाºहाणी समजून घेतली गेली तसेच पती-पत्नीलाही बोलावून त्यांचे स्वतंत्ररीत्या म्हणणे ऐकून घेत दोन्ही बाजूंच्या लोकांचा खास करून पती-पत्नीचे समुपदेशनावर अधिकाधिक भर देत एकमेकांविषयी झालेले गैरसमज दूर करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केलाजातो.महिलांना कायद्याचे सामान्यज्ञानशहरात शिक्षणाचे प्रमाण चांगले असून, महिला आपले हक्क, कर्तव्यांबाबत सजग असून, त्यांच्यामध्ये महिला सुरक्षाविषयक कायद्यांचे सामान्यज्ञानही दिसून येत असल्याचे डौले यांनी सांगितले. त्यामुळे समुपदेशन करताना फारशा अडचणी उद्भवत नाहीत. प्राप्त झालेल्या ६५० अर्जांपैकी बहुतांश अर्ज हे सुशिक्षित कुटुंबांचे आहेत.अशी आहेत कारणेमहिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे, शारीरिक तक्रारी, वंध्यत्वाची समस्या, माहेरून पैशांची मागणी, मुलींचाच होणारा जन्म, पतीची व्यसनाधिनता, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान नसणे अशी अनेकविध कारणे वैवाहिक जोडप्यांच्या कलहामागील असल्याचे समोर आले आहे. अनेकदा गैरसमजुतींमधून व न्यूनगंडापोटी पती-पत्नी किंवा त्यांच्या नातेवाइकांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन नातेसंबंधधोक्यात सापडतात.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFamilyपरिवार