शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:19 IST

समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.

ठळक मुद्देशुभवर्तमान : महिला सुरक्षा विभागाचे यश; सुशिक्षितांमध्ये वाढता कौटुंबिक कलह

नाशिक : समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.सुशिक्षित समाजाचे विचार प्रगल्भ होत जातात, हे अगदी खरे आहे. मात्र काहींवर पारंपरिक विचारांचा पगडा असल्यामुळे शहरात अनेकविध सुशिक्षित कुटुंबांमधील कलह चव्हाट्यावर येतात. कुटुंबाची बसलेली घडी विस्क टली जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून शरणपूररोड येथील सिग्नलजवळ महिला सुरक्षा विभाग पोलीस आयुक्तालयाकडून कार्यान्वित करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कौटुंबिक कलह व त्यामधून दोन कुटुंबांच्या नातेसंबंधात आलेले वितुष्ट कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न महिला पोलीसअधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केला जातो मागील वर्षभरात ६५० पीडित महिलांकडून तक्रारींचे अर्ज महिला सुरक्षा विभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार महिलेचे सासर व माहेरच्या नातेवाइकांना बोलावून घेत त्यांची गाºहाणी समजून घेतली गेली तसेच पती-पत्नीलाही बोलावून त्यांचे स्वतंत्ररीत्या म्हणणे ऐकून घेत दोन्ही बाजूंच्या लोकांचा खास करून पती-पत्नीचे समुपदेशनावर अधिकाधिक भर देत एकमेकांविषयी झालेले गैरसमज दूर करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केलाजातो.महिलांना कायद्याचे सामान्यज्ञानशहरात शिक्षणाचे प्रमाण चांगले असून, महिला आपले हक्क, कर्तव्यांबाबत सजग असून, त्यांच्यामध्ये महिला सुरक्षाविषयक कायद्यांचे सामान्यज्ञानही दिसून येत असल्याचे डौले यांनी सांगितले. त्यामुळे समुपदेशन करताना फारशा अडचणी उद्भवत नाहीत. प्राप्त झालेल्या ६५० अर्जांपैकी बहुतांश अर्ज हे सुशिक्षित कुटुंबांचे आहेत.अशी आहेत कारणेमहिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे, शारीरिक तक्रारी, वंध्यत्वाची समस्या, माहेरून पैशांची मागणी, मुलींचाच होणारा जन्म, पतीची व्यसनाधिनता, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान नसणे अशी अनेकविध कारणे वैवाहिक जोडप्यांच्या कलहामागील असल्याचे समोर आले आहे. अनेकदा गैरसमजुतींमधून व न्यूनगंडापोटी पती-पत्नी किंवा त्यांच्या नातेवाइकांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन नातेसंबंधधोक्यात सापडतात.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFamilyपरिवार