शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

गॉगलविक्रेत्याच्या मारेकऱ्यांची पोलिसांकडून ‘धिंड’

By admin | Updated: June 15, 2017 22:17 IST

पोलिसांनी या हल्ल्यातील चौघा संशयितांना अटक केली आहे. या संशयित हल्लेखोरांची पोलिसांनी शहरातून ‘धिंड’ काढली.

नाशिक : त्र्यंबकरस्त्यावर शासकिय वसाहतीजवळ गॉगलविक्री करणाऱ्या वडाळागावातील रहिवासी असलेल्या ऐतेशाम ईशाद अन्सारी याच्यावर प्राणघातक हल्ला करून संशयित फरार झाले होते. या हलल्यात अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या हल्ल्यातील चौघा संशयितांना अटक केली आहे. या संशयित हल्लेखोरांची पोलिसांनी शहरातून ‘धिंड’ काढली.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, त्र्यंबकरस्त्यावरील एका प्रार्थनास्थळाजवळ अन्सारी हा स्टॉल लावून गॉगलची विक्री करीत होता. त्याच्याकडे चार ते पाच तरुणांचे टोळके गॉगल खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. यावेळी खरेदी-विक्रीदरम्यान त्यांनी वाद घालून अन्सारीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अन्सारी गंभीर जखमी झाल्याने त्याचा रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. पोलिसांनी संशयिताविरुध्द दाखल केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा खूनाच्या गुन्ह्यात रुपांतरीत केला आहे. याप्रकरणी खूनाच्या हल्ल्यात मुंबईनाका पोलिसांनी एकूण सात संशयित हल्लेखोरांना अटक केली आहे. गॉगलविक्रे त्याची भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या हत्येच्या घटनेने समाजमन भयभीत झाले होते.

या हल्ल्यानंतर नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरणाबरोबरच हळहळही व्यक्त केली जात होती. भरदिवसा झालेल्या अशा प्राणघातक हल्ल्यामुळे शहराची कायदासुव्यवस्था कितपत सुरक्षित आहे, हे देखील चव्हाट्यावर आल्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव वाढला होता. तसेच मयत युवकाच्या नातेवाईकांसह मित्र परिवारानेही मंगळवारी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली होती. तसेच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ.राजू भुजबळ यांना खासगी रुग्णालयात घेराव घालून मारेकऱ्यांना अद्याप का अटक के ली नाही, असा जाब विचारला होता. ऐतेशामच्या वडीलांनी तर हात जोडून पोलीसांपुढे विनवणी करत माझ्या मुलाचा बळी घेणाऱ्यांना फासावर कधी लटकवणार असा संतप्त प्रश्न केला होता. हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले होते. ज्या रस्त्यांनी हे हल्लेखोर पळाले त्या रस्त्यांवरील सीसीटीव्हीमध्ये हे वाहनांसह कै द झाले होते. या गुंडांची दहशत कमी व्हावी आणि गुन्हेगारीला वचक बसावा यासाठी पोलिसांनी त्यांची परिसरातून वरात काढली. प्राणघातक हल्ल्यातील प्रमुख संशयित आरोपी जितेंद्र भगवान काळे (रा. घनकर लेन), मुकेश चंद्रकांत साळवे (रा. मल्हारखाण झोपडपट्टी) मनीष रेवर (रा. रामवाडी) या तीघांच्या मुसक्या आवळल्या आहे़ तसेच त्यांचे दोन साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही; मात्र पोलिसांनी या तीघांना आश्रय व मदत करणाऱ्या संशयितांनाही शोधून काढले असून यामध्ये चेतन यशवंत इंगळे, अजिंक्य प्रकाश धुळे, विशाल अशोक निकम (सर्व रा. दहावा मैल, ओझर) आणि योगेश चंद्रकांत धांडे यांनाही अटक केली आहे. या सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि़ १९) पोलीस कोठडी सुनावली आहे.