शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बनावट औषधे विक्री करणाऱ्यांना पोलिसांचे अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 19:47 IST

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र ब-याच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते.

ठळक मुद्देद्राक्ष उत्पादकांची फसवणूक : फरफेक्ट कंपनीचा तपास गुंडाळला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : द्राक्ष उत्पादकांना बनावट औषधांची महागड्या किमतीत विक्री करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी हाती लागण्याच्या आतच पोलीस यंत्रणेने तपास गुंडाळल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, शहरातील कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीकडून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करूनही त्याच्या मुळाशी जाणे टाळल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी व सूत्रधार तूर्त मोकळे फिरत आहेत.

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र बºयाच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांची काटेकोरपणे काळजी घेतली जात असल्याचे पाहूनच द्राक्षबागांसाठी लागणारी विविध प्रकारची औषधे पुरविणाºया कंपन्या उदयास आल्या असून, त्यात प्रामुख्याने मण्यांची फुगवणी व आकार वाढविण्यासाठी सीपीपीयू व पीजीआर ही औषधे गुणकारी ठरली आहेत. मात्र याच औषधांच्या नावाने बनावट औषधे तयार करून त्यांची खुलेआम विक्री करण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी कृषी विभागाच्या भरारी पथकाने हाणून पाडला होता. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथे मे. परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या दुकानात व गुदामातून सुमारे चौदा लाख रुपये किमतीचा बनावट व विनापरवाना औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता. बनावट औषधांची विक्री करून शेतकºयांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या कामगिरीचे शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येऊन या प्रकरणी कृषी विभागाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुकान मालक राजेंद्र मोदी याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार फसवणूक व कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघन या कायद्यान्वये मोदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मोदी याचा सहकारी भानुशाली नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी एक दिवसाच्या पोलीस कोठडीत जुजबी विचारपूस करून गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी हात आखडता घेतला. परिणामी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ते खुलेआम फिरत आहेत. परंतु शेतकºयांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला औषधांचा साठा आरोपींनी कोठून मिळविला, त्यांनी कोठे कोठे त्याची विक्री केली, औषधे तयार करण्यासाठी कच्चा माल कोठून आणला या साºया बाबी गुलदस्त्यातच आहेत. त्यामुळे कृषी खात्याने कारवाई करूनही निव्वळ पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे द्राक्ष उत्पादकांच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकलेला नाही.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकPoliceपोलिस