शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

खालप येथील विहीर विक्र ीबाबत पोलिसांत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:55 IST

खालप येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा विहिरीची विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी खालप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक अशा नऊ जणांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्दे तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांचा समावेश

नाशिक : खालप येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा विहिरीची विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी खालप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक अशा नऊ जणांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी ही माहिती दिली.दोन वर्षांपूर्वी खालप ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीच्या मूळ मालकालाच विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी कैलास देवरे यांनी शासनाकडे अर्ज केला होता. देवरे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता, परंतु याबाबत शासनस्तरावरून योग्य कार्यवाही होत नसल्याची त्यांची तक्र ार होती. याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयवंत भामरे यांनी तीन महिन्यांपूर्वीच देवळा पोलीस ठाण्याला फिर्याद दिली होती; परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी या प्रकरणाचा सर्वसमावेशक चौकशी अहवाल प्राप्त न झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात अडचण निर्माण झाली होती. याबाबत तत्कालीन पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी संबंधित विभागाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर विस्तार अधिकारी भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलमप्रमाणे तीन ग्रामसेवक, दोन माजी सरपंच, माजी उपसरपंच व तीन तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आदी नऊ जणांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर हे पुढील तपास करीत आहेत.वरिष्ठांची परवानगी न घेता ग्रामनिधीतून विहीर खरेदी करण्याकरिता लागणारे मुद्रांक शुल्क नोंदणीची ८,४३७ रुपये एवढा नियमबाह्य खर्च केला. विहिरीच्या जागा मालकांनी शासनाचे व ग्रामपंचायतीचे नुकसान होईल, अशा अटीवर विहिरीवर स्वत:चा हक्क अबाधित राखून विक्र ी केली. तसेच विहीर खोदकाम पूर्ण झाल्यावर विहिरीचा व शासकीय मालमत्तेचा स्वत:च्या हितासाठी वापर केला. योग्य ती प्रक्रिया न राबविता दि. १७/२/२०१६ रोजी सदर विहीर मूळ मालकास परत करीत विक्री करून दस्त बनविला.असे आहे प्रकरणसन २०११ ते १६ या कालावधीत तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी संगनमत करून खालप गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून दि. २२ जुलै २०११ रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव घेतला. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयांची परवानगी घेणे आवश्यक असताना, तसे न करता परस्पर खर्च करून दि. २७/०७/२०११ रोजी विहीर खरेदी केली. तसेच सदर विहिरीवर शासनाचा ६ लाख ८८ हजार ९७५ रु पये एवढा खर्च केला. तसेच ग्रामपंचायतीचे नुकसान होईल, अशा अटी स्वीकारून खासगी व्यक्तीचे हितसंबंध जोपासण्याकरिता शासकीय निधीचा वापर केला.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी