शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

पोलीस-प्रशासनाने सुरू केले जनप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:07 PM

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र व राज्य सरकार चिंतित असून, नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे हाच त्यावरील एकमेव उपाय ...

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव : गर्दी टाळण्याचे आवाहन; नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र व राज्य सरकार चिंतित असून, नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे हाच त्यावरील एकमेव उपाय असला तरी, गेल्या काही दिवसांपासून नागरिकच त्याविषयी बेफिकिरीने वागत असल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. संचारबंदी व कायद्याचा वापर करूनही नागरिक ऐकत नसल्याने आता पोलीस व प्रशासनाने जनतेचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कुठे हात जोडून तर कोठे विनंती करून घरीच थांबण्याचा सल्ला दिला जात आहे.नाशिक शहरात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नसला तरी, संशयित रुग्ण म्हणून गेल्या आठ दिवसांत जवळपास ४२ जणांना रुग्णालयात दाखल करून उपचाराअंति घरी सोडून देण्यात आले आहे ही समाधानकारक बाब असली तरी, कोरोना व्हायरसचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव त्याची लक्षणे आढळण्यास लागणारा विलंब पाहता, कोणत्याही नागरिकाने गाफील राहता कामा नये, अशी परिस्थिती आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने नागरिकांना गर्दी टाळण्याचा व घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसे झाल्यावरच कोरोनाची साखळी तोडता येणे शक्य आहे.शासनाच्या या आवाहनाला समाजातील काही घटकांकडून प्रतिसादही मिळत असला तरी, अद्यापही अनेकांना या गंभीर संभाव्य संकटाची भीती वाटत नाही. त्यामुळे पोलिसांकडून लोखंडी बॅरिकेट््स लावून रस्ते बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.नागरिकांसाठी संपर्क कक्षशहर पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहन वापरास व वाहतुकीस मनाई करण्यात आली असली तरी, पोलीस, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन यांच्याशी निगडित आस्थापनांमध्ये कामकाज करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. मात्र त्यांना कर्तव्य बजावताना त्रास होऊ नये, यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने संपर्क कक्ष तयार केला आहे. त्यासाठी अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली असून, नागरिकांना समस्या उद्भवल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.संपर्क अधिकारीनियंत्रण कक्ष- १००, ०२५३२३०५२३३, ३४सीताराम कोल्हे- ९८२३७८८०७७रघुनाथ शेगर- ९९२१२१६५७७दीपक गिरमे- ८६५२२२४१४०समाधान वाघ- ८८८८८०५१००लॉकडाउनच्या घोषणेमुळे काहीजणांचा असा समज झाला आहे की, सर्व सेवा बंद होणार आहेत की काय? परंतु कर्फ्यूच्या दरम्यानही सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतात. जनता कर्फ्यूच्या दिवशी तसेच राज्यात लागू असलेल्या १४४च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या जीवनावश्यक बाबी तशाच सुरू राहणार असल्याने कुणीही अजिबात घाबरू नये.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारीनागरिकांनी केवळ वैद्यकीय कारण किंवा अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. संचारबंदीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असून, नागरिकांनी संचारबंदीबाबत निष्काळजीपणा दाखविल्यास पोलीस प्रशासनाला नियमानुसार कारवाई करावी लागणार असल्याचे लक्षात ठेवावे.- विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्तवृत्तपत्रेही अत्यावश्यक सेवेतच...कोरोनाबाबत सोशल मीडियावरून व्हायरल होणाºया चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे तसेच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत वृत्तपत्रे हेच विश्वासार्ह व अचूक माहिती देणारे प्रभावी साधन असल्याने वृत्तपत्रांचा लॉकडाउनच्या स्थितीत अत्यावश्यक सेवेत समावेश केला गेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह शासन-प्रशासनाने वेळोवेळी तशी स्पष्टता केली आहे. त्यामुळे वाचकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन वृत्तपत्र व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या