शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

पीएम किसान निधीसाठी आता ‘आधार’ हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 02:02 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देनिधी मिळण्यास अडचण : नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत प्रतिवर्ष शेतकºयांना दहा हजार रुपये तीन टप्यात देण्याची योजना आहे. शेतकºयांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. पहिले दोन हप्तातील रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. मात्र आता ज्यांचे बॅँक खाते आधारलिंक आहेत आणि त्यांची माहिती आधाराशी जोडण्यात आली आहे अशााच शेतकºयांना लाभ होणार आहेत.जिल्ह्णात सुमारे तीन लाख शेतकरी लाभार्थी आहेत. नियमांमध्ये बदल करण्यात आल्यानुसार नोव्हेंबर अखेरीस शेतकºयांनी माहिती आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि संकेतस्थळावरही व्यवस्था करण्यात आली होती. असे असतानाही सुमारे तीन लाख शेतकºयांपैकी केवळ ५० हजारांच्या जवळपास शेतकरी माहिती आधार लिंक करू शकले. उर्वरित शेतकºयांनी अजूनही माहिती लिंक केली नसल्यामुळे त्यांना डिसेंबरमध्ये मिळणारा तिसरा हफ्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.शेतकºयांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. या कालावधीत जिल्ह्णातील केवळ ५० ते ५५ हजार शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासन अपडेट करू शकले आहेत. वेब पोर्टलवर सदर माहिती अपलोड करावी लागते. यासाठी वेळही बरच लागतो. त्यामुळे या पोर्टलरव सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.व्यस्त यंत्रणेमुळे गती मंदावलीमहाराष्टÑात निवडणुका असल्यामुळे आधार लिंक करण्याची प्रक्रिया काहीशी विलंबाने झाल्यामुळे लाखो शेतकरी या योजनेत आपली माहिती परिपूर्ण भरू शकलेले नाहीत. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या यंत्रणेमुळे नोंदणी काहीशी मागे पडली होती. पुढीलवर्षी २०२० पर्यंत सर्व शेतकºयांची माहिती आधार लिंक केली जाणार असलचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी