शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पीएम किसान निधीसाठी आता ‘आधार’ हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 02:02 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देनिधी मिळण्यास अडचण : नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत प्रतिवर्ष शेतकºयांना दहा हजार रुपये तीन टप्यात देण्याची योजना आहे. शेतकºयांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. पहिले दोन हप्तातील रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. मात्र आता ज्यांचे बॅँक खाते आधारलिंक आहेत आणि त्यांची माहिती आधाराशी जोडण्यात आली आहे अशााच शेतकºयांना लाभ होणार आहेत.जिल्ह्णात सुमारे तीन लाख शेतकरी लाभार्थी आहेत. नियमांमध्ये बदल करण्यात आल्यानुसार नोव्हेंबर अखेरीस शेतकºयांनी माहिती आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि संकेतस्थळावरही व्यवस्था करण्यात आली होती. असे असतानाही सुमारे तीन लाख शेतकºयांपैकी केवळ ५० हजारांच्या जवळपास शेतकरी माहिती आधार लिंक करू शकले. उर्वरित शेतकºयांनी अजूनही माहिती लिंक केली नसल्यामुळे त्यांना डिसेंबरमध्ये मिळणारा तिसरा हफ्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.शेतकºयांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. या कालावधीत जिल्ह्णातील केवळ ५० ते ५५ हजार शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासन अपडेट करू शकले आहेत. वेब पोर्टलवर सदर माहिती अपलोड करावी लागते. यासाठी वेळही बरच लागतो. त्यामुळे या पोर्टलरव सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.व्यस्त यंत्रणेमुळे गती मंदावलीमहाराष्टÑात निवडणुका असल्यामुळे आधार लिंक करण्याची प्रक्रिया काहीशी विलंबाने झाल्यामुळे लाखो शेतकरी या योजनेत आपली माहिती परिपूर्ण भरू शकलेले नाहीत. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या यंत्रणेमुळे नोंदणी काहीशी मागे पडली होती. पुढीलवर्षी २०२० पर्यंत सर्व शेतकºयांची माहिती आधार लिंक केली जाणार असलचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी