शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान निधीसाठी आता ‘आधार’ हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 02:02 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देनिधी मिळण्यास अडचण : नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत प्रतिवर्ष शेतकºयांना दहा हजार रुपये तीन टप्यात देण्याची योजना आहे. शेतकºयांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. पहिले दोन हप्तातील रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. मात्र आता ज्यांचे बॅँक खाते आधारलिंक आहेत आणि त्यांची माहिती आधाराशी जोडण्यात आली आहे अशााच शेतकºयांना लाभ होणार आहेत.जिल्ह्णात सुमारे तीन लाख शेतकरी लाभार्थी आहेत. नियमांमध्ये बदल करण्यात आल्यानुसार नोव्हेंबर अखेरीस शेतकºयांनी माहिती आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि संकेतस्थळावरही व्यवस्था करण्यात आली होती. असे असतानाही सुमारे तीन लाख शेतकºयांपैकी केवळ ५० हजारांच्या जवळपास शेतकरी माहिती आधार लिंक करू शकले. उर्वरित शेतकºयांनी अजूनही माहिती लिंक केली नसल्यामुळे त्यांना डिसेंबरमध्ये मिळणारा तिसरा हफ्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.शेतकºयांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. या कालावधीत जिल्ह्णातील केवळ ५० ते ५५ हजार शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासन अपडेट करू शकले आहेत. वेब पोर्टलवर सदर माहिती अपलोड करावी लागते. यासाठी वेळही बरच लागतो. त्यामुळे या पोर्टलरव सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.व्यस्त यंत्रणेमुळे गती मंदावलीमहाराष्टÑात निवडणुका असल्यामुळे आधार लिंक करण्याची प्रक्रिया काहीशी विलंबाने झाल्यामुळे लाखो शेतकरी या योजनेत आपली माहिती परिपूर्ण भरू शकलेले नाहीत. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या यंत्रणेमुळे नोंदणी काहीशी मागे पडली होती. पुढीलवर्षी २०२० पर्यंत सर्व शेतकºयांची माहिती आधार लिंक केली जाणार असलचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी