शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘प्लेज फॉर लाइफ’  राष्ट्रीय अभियान:  विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:47 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़

नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़ या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात प्रतिदिन ५३० मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास सुरुवात करतात़ तंबाखूच्या व्यसनापासून विद्यार्थी दूर राहावेत यासाठी ‘प्लेज फॉर लाइफ’ हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले असून, त्यात आठ जिल्ह्यांतील २५ हजार विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली आहे़  महाराष्ट्रातील सुमारे २६ लाख विद्यार्थी या तंबाखूविरोधी मोहिमेचे संदेशदूत बनले असून, राज्यातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१७ (गेट्स) नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे (२़४) अडीच कोटी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामध्ये दोन कोटी लोक हे तोंडावाटे तंबाखूचे सेवन करतात तर ४० लाख धूम्रपान करणारे आहेत़ त्यांच्या व्यसनाचा परिणाम व्यसनकर्त्याप्रमाणे निर्व्यसनी लोकांच्या आरोग्यावर होतो़ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाºया आजारांमुळे महाराष्ट्रात ४५ हजार लोकांचा मृत्यू होतो.शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि संबंध हेल्थ फाउंडेशनतर्फे ‘प्लेज फॉर लाइफ’ हे राष्ट्रीय अभियान राबविले जात असून, त्यातून विद्यार्थ्यांना तंबाखूविरोधी माहितीपट दाखवून जागृती केली जात आहे. सोबत तंबाखूविरोधी सामूहिक शपथ घेत शाळा आणि समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते.२६ लाख विद्यार्थी संदेशदूत‘प्लेज फॉर लाइफ’ या अभियानानुसार जळगाव (८ लाख ५१ हजार ९४७), अकोला (२ लाख ३७ हजार), अमरावती (३ लाख ८० हजार), नागपूर (२ लाख ४ हजार), चंद्रपूर (१ लाख ९७ हजार १९२), बुलढाणा (१ लाख ४० हजार २७५) तर वर्धा (७६ हजार ९८४) विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम आखण्यात आली असून शपथ घेतलेले २६ लाख विद्यार्थी या मोहिमेचे संदेशदूत असणार आहेत. राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून तंबाखूच्या व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी शिक्षक आणि विध्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित त्यांची एक साखळी निर्माण केली जाणार आहे. लहान वयातील मुलांपासून जागृती केली जाणार असून, विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावेत यासाठी त्यांना माहिती दिली जाणार आहे. सुरक्षित व तंबाखूमुक्त विद्यार्थ्यांसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने तंबाखू सेवन विरोधी संदेशाबाबत जनजागृती केली जाईल़  - विशाल सोळंखी, आयुक्त, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :cancerकर्करोगStudentविद्यार्थी