शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

चुकीच्या भारनियमनामुळे रात्रीची कांदा लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 17:21 IST

खामखेडा : कांदारोप उशिरा लागवडीला आल्याने सध्या खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, परिसरात आठवड्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देखामखेडा : कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना करावी लागते धडपड

खामखेडा : कांदारोप उशिरा लागवडीला आल्याने सध्या खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, परिसरात आठवड्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.डिसेंबर महिन्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने आठवड्यातील तीन दिवस रात्री ९.३० ते सकाळी ७.३० असा वीज पुरवठ्याच धोरण राबवल्याने येन उन्हाळ कांदा लागवडीच्या कालावधीत शेतकऱ्यांची थट्टा केली. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीना निवेदने देत वेळ बदलण्याची विनंती केली. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेतली गेली नाही.त्यामुळे आठवड्यातील फक्त चारच दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याने या कालावधीतच फक्त कांदा लागवड करता येते. रात्रीच्या वेळेत वीज असलेल्या दिवशी मात्र शेतकऱ्यांना लागवड करता येत नाही.त्यातच यावर्षी शेतकऱ्याची कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झालीत. काहींनी दुबार तर काहींनी तिबार रोप टाकलीत. महागडी रोप असल्याने त्याची वाढ व उगवण क्षमता योग्य दिसून येत नसल्याने व ढगाळ वातावरणाने लागवडीला आलेली रोपे खराब होत असल्याने रात्रीची जोखीम पत्करून या कडाक्याच्या थंडीत अनेक शेतकऱ्यांना कांदा लागवड करावी लागत आहे.रात्रीच्या वेळेस वीज असलेल्या दिवशी शेतकरी शेतात विजेची व्यवस्था करत कांदा लागवडीची तजवीज करत कांदा लागवड करत आहे. मजूर रात्रीच्या वेळी कांदा लागवडीला जुमानत नाहीत. मात्र विजेअभावी अधिकची मजुरी देत शेतकऱ्यांना सध्या लागवड उरकावी लागत आहे.किमान कांदा लागवडीसाठी दिवसा पुर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेऊन शेतकरी हिताचे धोरण कंपनीने राबवावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या बाबतीत कुठलाच निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांची पिळवणूकच वीज वितरण कंपनी करत असल्याचे चित्र विदारक आहे.- किशोर चव्हाण, तालुकाध्यक्ष, भाजपाभारनियमनाच्या चुकीची वेळ कांदा लागवडीसाठी अडचणीची ठरत आहे. महागडी कांदा रोपे तसेच मजूर टंचाई यामुळे सर्वच बाजूने शेतकऱ्यांची पिळवणूकच होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचे होत असलेले हाल पहावेत.- संदीप मोरे, शेतकरी, खामखेडा. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी