रायफलमधून सुटली चुकून गोळी
By Admin | Updated: October 12, 2016 00:36 IST2016-10-12T00:36:00+5:302016-10-12T00:36:24+5:30
सप्तशृंगगड : आठ जखमी; भाविकांत घबराट

रायफलमधून सुटली चुकून गोळी
वणी/सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवाच्या सांगतेनंतर विजयादशमीला यज्ञकुंडातील होमामध्ये बोकडाचे मुख अर्पण करण्याची परंपरा असून, प्रकोप शांत करण्यासाठी बोकडाचे मुख अर्पण करण्याचे आयोजन विजयादशमीला गडावरील पंचविसाव्या पायरीजवळ आखण्यात आले होते. प्रथेनुसार तयारी सुरू असताना सुरक्षारक्षकाकडून अनावधानाने रायफलचा ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटून आठ जण जखमी झाले.
त्यात मंदिर प्रशासन व न्यासाचे चार कर्मचारी व चार ग्रामस्थ आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गडावर ही घटना घडली. मनोज वाघ कुटुंबीयांकडे हा मान आहे. दत्तमंदिराजवळील उंबराच्या झाडाजवळ व परिसरात हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मुख अर्पण करण्यासाठी बोकड गडावर आणताना गर्दी नियंत्रण मिळवित असताना सैन्य दलातील सेवानिवृत्त व न्यासाच्या सुरक्षारक्षक पथकात कार्यान्वित श्रावण चव्हाण (४८) हे विधिपूर्ततेची प्रतीक्षा करत रायफलने सलामी देण्याच्या तयारीत असताना जमिनीलगत तोंड असलेल्या रायफलच्या ट्रिगरवरील बोट दाबला गेल्याने रायफलीमधील गोळी सुटली. ही सुटालेली गोळी जमिनीवरील फरशीवर आदळली. या गोळीचे तुकडे झाले तसेच गोळी जोरात आदळल्याने फरशीही फुटली.यातील तुकडे उडून सागर दुबे (२८, रा. नांदूर), रामचंद्र पवार (२५), सुरक्षारक्षक शरद सिसोदे (२८), सुरक्षा कर्मचारी गणेश देशमुख, कर्मचारी पद्माकर देशमुख (३०), संतोष पवार, मधुकर गवळी यांना ते लागल्याने जखमी झाले. सागर दुबे यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांच्यासह जखमींना नाशिकच्यां जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बोकडबळीनंतर रायफलने
हवेत फैरी झाडून सलामी देण्याची परंपरा आहे. याचे नियोजन व नियंत्रण यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकारघडला.संबंधित सुरक्षा रक्षकावर गुन्हादाखल कर ण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)