शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

फाळके स्मारकाला गत वैभव प्राप्त करून देणार: महापौर सतीश कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:27 IST

नाशिक- शहराचा विकास करताना आधी मुलभूत सुविधांकडे लक्ष पुरवले पाहिजे. नविन प्रकल्प सुरू करण्याआधी जुने प्रकल्प सुरू करण्याचा मानस नाशिकचे नवनिर्वाचीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकला देखील गतवैभव प्राप्त करून दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देउगाच अवास्तव घोषणा नाहीमुलभूत सुविधांना प्राधान्य देणार

नाशिक- शहराचा विकास करताना आधी मुलभूत सुविधांकडे लक्ष पुरवले पाहिजे. नविन प्रकल्प सुरू करण्याआधी जुने प्रकल्प सुरू करण्याचा मानस नाशिकचे नवनिर्वाचीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकला देखील गतवैभव प्राप्त करून दिले जाईल असे त्यांनी सांगितले. नाशिकच्या महापौरपदी कुलकर्णी यांची शुक्रवारी (दि.२२) निवड झाली. त्यानंतर त्यांनी लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी आपल्या कल्पना मांडल्या.

प्रश्न- सामान्य नगरसेवक ते शहराचा प्रथम नागरीक या प्रवासाविषयी काय सांगाल?कुलकर्णी- मी मुळातच राजकारणी नाही. सामाजिक कार्याची आवड असल्याने ते काम मी डीजीपी नगर परिसरात करीत होतो. १९९७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होती. त्यावेळी माझे काम बघून परिसरातील नागरीकांनी भाजपाचे नेते (कै.) बंडोपंत जोशी यांची भेट घेतली. आणि मला उमेदवारी देण्याची मागणी केली. जोशी यांनी मला संधी दिली आणि प्रथमच निवडून आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत पाच वेळा निवडून आलो. नागरीकांच्या प्रेमामुळेच मी महापौरपदापर्यंत पोहोचू शकलो.

प्रश्न- महापौर झाल्यानंतर प्रत्येक जण काही तरी वेगळी योजना राबवितो तुमची कल्पना काय?कुलकर्णी- आवाक्यात असलेल्या घोषणाच केल्या पाहिजे असे माझे मत आहे. त्यामुळे मी नाशिकचे सिंगापूर करेल वगैरे घोषणा करणार नाही. परंतु नाशिकच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करणार आहे. मी आरोग्य सभापती असताना खूप निर्णय घेतले. त्यातील काही अमलात आले तर काही प्रशासनाने अडवले. परंतु शहर स्वच्छ झाले पाहीजे याला प्राधान्य राहणार आहे.

प्रश्न- तुमचा ड्रीम प्रोजेक्ट कोणता असेल?कुलकर्णी- शहरात चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे स्मारक असून काही वर्षांपूर्वी पर्यंत ते शहराचे भूषण होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळेत त्याची रया गेली आहे. त्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करेल. शहरातील कानेटकर उद्यान तसेच अन्य अनेक प्रकल्प बंद स्थितीत असून ते सर्व प्रथम सुरू करणार आहे. या शिवाय शहरातील नागरीकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या त्याच्या भागातील समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरBJPभाजपा