शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरी करणाऱ्यांची कायमस्वरूपी नळजोडणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:14 IST

महापालिका दररोज पाण्याचा उपसा करते तितके पाण्याचे बिलिंग होत नसल्याने शहरात १७४ एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे मान्य करीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना अशाप्रकारे चोरी करणाऱ्यांवर गंभीर कारवाईचा बडगा उगारणाºयांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देराधाकृष्ण गमे यांचे संकेत : गंगापूरमधील ६०० एमसीएफटी पाणी मृतसाठा धरण्याचा प्रस्ताव

नाशिक : महापालिका दररोज पाण्याचा उपसा करते तितके पाण्याचे बिलिंग होत नसल्याने शहरात १७४ एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे मान्य करीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना अशाप्रकारे चोरी करणाऱ्यांवर गंभीर कारवाईचा बडगा उगारणाºयांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. यापुढे पाणी चोेरी करणाºयांची नळजोडणी कायमस्वरूपी बंद करून त्यांना पाणीच न देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जाहीर केले.महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि.१९) पार पाडली. गेल्या ३० जूनपासून महापालिकेने शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केल्याने त्यातील अडचणींबाबत जोरदार चर्चा झाली तसेच प्रशासन गावठाणावर अन्याय करीत असल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व प्रश्नांना उत्तरे देताना आयुक्तांनी कपातीची कारणे सांगत समर्थन केले. तथापि, पाणीचोरीविषयी गंभीर दखल घेतली. दररोज ४६० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा करून प्रत्यक्षात १७४ लिटर्स पाण्याचे बिलिंग होत नाही. शहरात एकीकडे पाणीकपातीमुळे एकवेळही पाणीपुरवठा होत नसताना दुसरीकडे कोणत्याही ठिकाणी पाणीचोरी होत असेल तर संबंधितांना यापुढे पाणीच न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी सांगितले.गंगापूर धरण समूहातील पाण्याच्या साठ्याबाबत जलसंपदा विभाग देत असलेली माहिती आणि प्रत्यक्षातील स्थिती यात तफावत होती. ९ दशलक्षघनफूट इतके कमी पाणी उचलल्यानंतर धरणातील पातळी रोज १५ सेंमी इतकी कमी होत असल्याने अखेरीस महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. चेहेडी बंधाºयातून अळ्यायुक्त पाणी येऊ लागल्याने महिनाभरासाठी तेथील पाणीपुरवठा बंद झाला होता. अशावेळी मुकणे धरणावरच मदार होती. त्यामुळे फेब्रुवारीत चाचणीच्या नावाखाली महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केला आणि तो कायम ठेवला.वितरण वाहिन्यांसाठी ‘अमृत’मधून २०५ कोटीमहापालिकेच्या वतीने शहरात वितरण वाहिन्यांचे जाळे विणण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचा पाठपुरावा सुरू असून, महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाने मात्र जलकुंभ वगळता केवळ वितरण वाहिन्यांसाठी २०५ कोटी रुपये मंजूर करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. जलकुंभ महापालिकेलाच स्वखर्चाने बांधावे लागतील. दरम्यान, वितरण वाहिन्या कुठे आहेत, याबाबत अनेकदा माहिती नसते त्या पार्श्वभूमीवर आता जलवाहिन्यांचे जीओ फेन्सिंग करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी