शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

पाणीचोरी करणाऱ्यांची कायमस्वरूपी नळजोडणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:14 IST

महापालिका दररोज पाण्याचा उपसा करते तितके पाण्याचे बिलिंग होत नसल्याने शहरात १७४ एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे मान्य करीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना अशाप्रकारे चोरी करणाऱ्यांवर गंभीर कारवाईचा बडगा उगारणाºयांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देराधाकृष्ण गमे यांचे संकेत : गंगापूरमधील ६०० एमसीएफटी पाणी मृतसाठा धरण्याचा प्रस्ताव

नाशिक : महापालिका दररोज पाण्याचा उपसा करते तितके पाण्याचे बिलिंग होत नसल्याने शहरात १७४ एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे मान्य करीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना अशाप्रकारे चोरी करणाऱ्यांवर गंभीर कारवाईचा बडगा उगारणाºयांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. यापुढे पाणी चोेरी करणाºयांची नळजोडणी कायमस्वरूपी बंद करून त्यांना पाणीच न देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जाहीर केले.महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि.१९) पार पाडली. गेल्या ३० जूनपासून महापालिकेने शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केल्याने त्यातील अडचणींबाबत जोरदार चर्चा झाली तसेच प्रशासन गावठाणावर अन्याय करीत असल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व प्रश्नांना उत्तरे देताना आयुक्तांनी कपातीची कारणे सांगत समर्थन केले. तथापि, पाणीचोरीविषयी गंभीर दखल घेतली. दररोज ४६० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा करून प्रत्यक्षात १७४ लिटर्स पाण्याचे बिलिंग होत नाही. शहरात एकीकडे पाणीकपातीमुळे एकवेळही पाणीपुरवठा होत नसताना दुसरीकडे कोणत्याही ठिकाणी पाणीचोरी होत असेल तर संबंधितांना यापुढे पाणीच न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी सांगितले.गंगापूर धरण समूहातील पाण्याच्या साठ्याबाबत जलसंपदा विभाग देत असलेली माहिती आणि प्रत्यक्षातील स्थिती यात तफावत होती. ९ दशलक्षघनफूट इतके कमी पाणी उचलल्यानंतर धरणातील पातळी रोज १५ सेंमी इतकी कमी होत असल्याने अखेरीस महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. चेहेडी बंधाºयातून अळ्यायुक्त पाणी येऊ लागल्याने महिनाभरासाठी तेथील पाणीपुरवठा बंद झाला होता. अशावेळी मुकणे धरणावरच मदार होती. त्यामुळे फेब्रुवारीत चाचणीच्या नावाखाली महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केला आणि तो कायम ठेवला.वितरण वाहिन्यांसाठी ‘अमृत’मधून २०५ कोटीमहापालिकेच्या वतीने शहरात वितरण वाहिन्यांचे जाळे विणण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचा पाठपुरावा सुरू असून, महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाने मात्र जलकुंभ वगळता केवळ वितरण वाहिन्यांसाठी २०५ कोटी रुपये मंजूर करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. जलकुंभ महापालिकेलाच स्वखर्चाने बांधावे लागतील. दरम्यान, वितरण वाहिन्या कुठे आहेत, याबाबत अनेकदा माहिती नसते त्या पार्श्वभूमीवर आता जलवाहिन्यांचे जीओ फेन्सिंग करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी