शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ग्रामीण विकास यंत्रणा बैठकीत लोकप्रतिनिधी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:02 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शासकीय कामातील दिरंगाई, गैरप्रकार आणि थकीत अनुदानाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था, पेयजल योजनेतील गैरप्रकार, शौचालयाचे थकलेले अनुदान आदी मुद्द्यांवर बैठकीत जोरदार चर्चा झाली.

नाशिक : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शासकीय कामातील दिरंगाई, गैरप्रकार आणि थकीत अनुदानाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था, पेयजल योजनेतील गैरप्रकार, शौचालयाचे थकलेले अनुदान आदी मुद्द्यांवर बैठकीत जोरदार चर्चा झाली.यावेळी खासदार हेमंत गोडसे व खासदार भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच, संजय गांधी व इतर योजनेसाठी प्राप्त अर्ज व लाभार्थी याची आठ दिवसांत माहिती सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची समन्वयक व सहनियंत्रक (दिशा) समितीची बैठक शुक्र वारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, यांनी प्रशासकीय यंत्रणेतील कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्तकरीत कामे होणार नसतील तर लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. यावेळी झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लिना बनसोड यांचे यंत्रणेतील कामकाजाकडे लक्ष वेधले.यावेळी खासदारांनी जिल्ह्णातील योजनांविषयी विचारणा केली असता अनेक योजना रखडल्या असल्याचे समोर आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा, रस्ते, शौचालय, स्वच्छ भारत अभियान, कृषी, संजय गांधी निराधार योजना आदी मुद्दे या बैठकीत गाजले. स्वांतत्र्य मिळून ७० वर्षांनंतरही गावांमध्ये रस्ते पोहोचले नसल्याने जनतेचा मार्ग खडतर बनल्याचे सांगितले.अजूनही अनेक गावांमध्ये कच्चे रस्ते असून केवळ कागदावर रस्ते सुधारण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याकडेही लक्ष वेधले. पंचायत समिती तत्काळ या समस्येची दखल घेऊन रस्ते बांधावे, असे आदेश बैठकीत देण्यात आले.सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांच्या बाबतीतील दिरंगाई नित्याचीच बाब झाल्याचा आरोप खासदारांनी केला. निराधार, दिव्यांग, विधवा महिलांसाठी शासनाकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वार्धक्य योजनांसाठी राज्य व केंद्र यांच्याकडूननिधी येतो तरीही लाभार्थी वाढत का नाही? असा प्रश्न भारती पवार यांनी विचारला. योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजूंना वारंवार तहसील कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागतात. अधिकारी काम करत नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी पुढील आठ दिवसांत वरील योजनाचा अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार