शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

पांजरवाडी सरपंच सदस्य, ग्रामस्थांचे अमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 17:58 IST

येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास सुरु वात केली आहे.

ठळक मुद्देगावातील जुनी विहीर बुजविणाऱ्यांवर कारवाईची मागणी

येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास सुरु वात केली आहे.पांजरवाडी येथील दगडाच्या बांधकामात जुन्या काळातील सार्वजनिक विहीर होती. सदर विहिरींवरून गावातील लोक पाणी वापरत होते. सदर विहिरीची साफसफाई करण्यात यावी सर्वांची मागणी असतांना अचानक ही विहीर रात्रीतून गावातील काही लोकांनी बुजविली. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक, प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना पांजरवाडीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने सोमवारी सरपंच जन्याबाई गायकवाड, उपसरपंच मुक्ताबाई घोडेराव, सदस्य श्रीकांत आगवन, विरेश घोडेराव, जगन घोडेराव, शांताराम देवरे, अशोक घोडेराव, अशोक देवरे, बाळू देवरे, जिजाराम देवरे, सुरेश भगत, संजय आगवन, रावसाहेब देवरे, भागीनाथ गायकवाड, बाळू गांगुर्डे, संजय गांगुर्डे, भगवान घोडेराव, मच्छीन्द्र देवरे, उत्तम घोडेराव, रमेश देवरे, रामनाथ आगवन, एकनाथ देवरे, अंजना घोडेराव, रेणुका गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक अशोक आडसरे यांना दोन वेळेस निवेदन देऊन सदरची विहीर ही ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता असताना का बुजविण्यात आली? बुजविण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी घेतली होती का? याचा खुलासा करण्यासंदर्भात मागील महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर ग्रामसेवकाने कुठलीही कारवाई केली नाही. सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरु वात झाल्यानंतर प्रभारी सभापती रु पचंद भागवत, गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात ग्रामसेवक अशोक आडसरे, उपोषणकर्ते सरपंच, सदस्य, विहीर बुजविणारे लोक यांची बैठक घेतली. त्यानंतर विहीर पुन्हा मोकळी करण्यासंदर्भात या बैठकीत एकमत झाले नाही.गटविकास अधिकाºयांनी सरपंचाच्या नावाने विहीर ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून उकरून घ्यावा असे लेखी पत्र दिले, मात्र लेखी पत्रावर ग्रामसेवकाचे नाव नसल्याने उपोषणकर्त्यांनी हे पत्र घेतले नाही. ग्रामसेवकही यानंतर पंचायत समिती कार्यालयातून निघून गेल्याने उपोषणावर रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.