शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

पेगलवाडी येथील साधुग्रामच्या जागेत वाहनतळ केल्यास सोयीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:09 IST

खंबाळे येथे पार्किंग करून लोकांच्या गैरसोयीत भरच टाकण्याऐवजी पेगलवाडी येथील साधुग्रामच्या जागेत वाहनतळ केल्यास सर्वांनाच सोयीचे होईल, असे मत जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येथील खंबाळे येथे पार्किंग करून लोकांच्या गैरसोयीत भरच टाकण्याऐवजी पेगलवाडी येथील साधुग्रामच्या जागेत वाहनतळ केल्यास सर्वांनाच सोयीचे होईल, असे मत जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे. वाहनतळ नियोजनाबाबत समस्त त्र्यंबककरांनी कडवटपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष तृप्ती धारणे यांनी त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांसह जिल्हाधिकारी नाशिक यांना तहसीलदारांमार्फत एक निवेदन दिले आहे. त्र्यंबकेश्वर येथे पौष वद्य एकादशीला संत निवृत्तिनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते. दशमी, एकादशी (मुख्य यात्रा) व द्वादशी अशी तीन दिवस यात्रा भरते. या यात्रेला ५ ते ६ लाख भाविक यात्रेकरू येत असतात. त्या तुलनेत तिसºया श्रावणी सोमवारला गर्दी होत नाही. याशिवाय तिसºया श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर लोक शनिवार, रविवार व सोमवार अशी गर्दी करतात. म्हणजे तिसºया सोमवारची गर्दी विभागली जाते.  खंबाळे येथे पार्किंग करण्यासंदर्भात प्रशासनातर्फे एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करून भाविकांसह स्थानिकांना अडचणीत टाकले आहे. त्र्यंबकेश्वरहून दररोज नोकरी-व्यवसायानिमित्ताने ये-जा करणारे, शाळा-कॉलेजात जाणारे, अचानक महत्त्वाच्या कामासाठी याशिवाय आजारी रुग्णास घेऊन जाणे-आणणे, तीन दिवस स्वतंत्र वाहनातून दैनिकांचे पार्सल आणणे आदींची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे, खंबाळे, पहिने, अंबोली व तळवाडे येथून बसने येणे यात्रेकरूंसाठी गैरसोयीचे ठरणार आहे. कारण यातील बरेच वृद्ध, भाविक, मुले आदी तसेच स्वत:ची आलिशान कार सोडून कधीही बसमधून प्रवास न केलेले भाविक वृद्ध असेही लोक श्रावणी सोमवारला येतात. यासाठी साधुग्रामचा वाहनतळ शहरापासून तीन कि.मी. दूर असला तरी सोयीचा ठरणार आहे. हे वाहनतळ खंबाळे वाहनतळाला सोयीचे ठरणारे वाहनतळ आहे. अन्य तळवाडे, पहिने व अंबोली हे वाहनतळदेखील ६/७ किलोमीटर अंतरावर आहेत. याशिवाय जव्हारफाटा बसस्थानक ते पोलीस स्टेशन मार्गे त्र्यंबक नगरपालिका कोपºयावरून तेली गल्ली मार्गे कुशावर्त तीर्थ येथून अंघोळ करून त्र्यंबकेश्वर मंदिरातून दर्शन करून प्रदक्षिणेला जाणे अथवा न जाणे हे भाविकांनी ठरवायचे आहे. तसेच गंगाद्वार, ब्रह्मगिरीला जाणारे असेही भाविक असतात. हा सर्व प्रवास भाविकांना पायीच करायचा आहे. त्यासाठीच शहराच्या व भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष तृप्ती धारणे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. येथे तिसºया श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते.  जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या वाहतूक नियोजनात खासगी वाहनांना दि. ५ ते ८ आॅगस्टपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली असल्याने ते बदलण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष तृप्ती धारणे यांनी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार महेंद्र पवार यांच्या माध्यमातून शिष्टमंडळासह निवेदन दिले आहे. दरवर्षीप्रमाणे प्रदक्षिणेच्या आदल्या दिवशी पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.तिसºया सोमवारकरिता जिल्हा प्रशासनाने वाहनांना केलेली प्रवेशबंदी भाविकांसह नागरिकांची कोंडी करणारी ठरणारी आहे. या सोमवारी गर्दीचे नियोजन करण्यासाठी रविवारपासून सोमवार सायंकाळपर्यंत वाहनांना शहराकडे प्रवेशबंदी करणे रास्त आहे. तसेच श्रावणी सोमवारी प्रदक्षिणेस येणारे भाविक रविवारी रात्री ८ वाजेनंतर येतात आणि सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून परततात. मात्र प्रशासनाने सलग चार दिवस प्रवेशबंदी केल्यामुळे त्र्यंबककरांसह परिसरातील नागरिकांवर व भाविकांवर त्याचा परिणाम होणार असल्याने ती रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या काळात प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक यांना विनाकारण वेठीस धरले जाते. त्यामुळे हे नियोजन बदलावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी गटनेते रवींद्र सोनवणे, पुरुषोत्तम कडलग, पुरुषोत्तम लोहगावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.