शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पावसाअभावी भात शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:17 IST

पेठ -जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील भाताची शेती संकटात सापडली असून भात व नागलीची रोपे करपू लागली आहेत. शिवाय बियाणांची उगवण क्षमताही घटली आहे.

पेठ -जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील भाताची शेती संकटात सापडली असून भात व नागलीची रोपे करपू लागली आहेत. शिवाय बियाणांची उगवण क्षमताही घटली आहे.पेठ तालुक्यात खरीप हंगामात भात व नागली ही दोनच पिके घेतली जातात. भात पिकाची साधारणपणे बियाणे पेरणी व लावणी अशा दोन टप्प्यात शेती केली जाते. यावर्षी निसर्ग वादळाच्या निमित्ताने झालेल्या पावसाचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी भात व नागलीची बियाणे पेरली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागात भाताची रोपे करपू लागली असून पुरेशा पाण्याअभावी रोपेही विरळ झाली आहेत. अजून काही दिवस अशाच प्रकारे पावसाने पाठ फिरवली तर आदिवासी शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.------------------------------------दुबार पेरणीला संधी नाहीएरवी पाऊस लांबल्याने वाया गेलेल्या पेरण्या दुबार केल्या जातात.बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन पिकांची दुबार पेरणी शक्य असते. मात्र भात व नागली या पिकांची दुबार पेरणी करण्याची संधी नसल्याने एकदा वाया गेलेले पिक पुन्हा पेरणी करून लावणी करणे शक्य नसल्याने शेतकर्यांचा खरीप हंगाम हातातून जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.जूलै महिन्यात बहुतांश शेतकर्यांची लावणी पुर्ण होत असतांना या वर्षी अजूनही भाताची खाचरे कोरडीच असल्याने वेळ असूनही शेतकर्यांना शेतीची कामे करता येत नाहीत.------------------------पेठ तालुक्यात जवळपास १०० टक्के भात व नागली बियाणे पेरणी झाली असून पाऊस लांबल्याने डोंगर उतारावर पेरणी केलेली रोपे पिवळी पडू लागली असून ज्या शेतकºयांना थोडीफार पाण्याची सोय आहे असे शेतकरी रोपे वाचवण्याची धडपड करत आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे.-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ------------------------------

टॅग्स :Nashikनाशिक