शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पावसाअभावी भात शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:17 IST

पेठ -जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील भाताची शेती संकटात सापडली असून भात व नागलीची रोपे करपू लागली आहेत. शिवाय बियाणांची उगवण क्षमताही घटली आहे.

पेठ -जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील भाताची शेती संकटात सापडली असून भात व नागलीची रोपे करपू लागली आहेत. शिवाय बियाणांची उगवण क्षमताही घटली आहे.पेठ तालुक्यात खरीप हंगामात भात व नागली ही दोनच पिके घेतली जातात. भात पिकाची साधारणपणे बियाणे पेरणी व लावणी अशा दोन टप्प्यात शेती केली जाते. यावर्षी निसर्ग वादळाच्या निमित्ताने झालेल्या पावसाचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी भात व नागलीची बियाणे पेरली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागात भाताची रोपे करपू लागली असून पुरेशा पाण्याअभावी रोपेही विरळ झाली आहेत. अजून काही दिवस अशाच प्रकारे पावसाने पाठ फिरवली तर आदिवासी शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.------------------------------------दुबार पेरणीला संधी नाहीएरवी पाऊस लांबल्याने वाया गेलेल्या पेरण्या दुबार केल्या जातात.बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन पिकांची दुबार पेरणी शक्य असते. मात्र भात व नागली या पिकांची दुबार पेरणी करण्याची संधी नसल्याने एकदा वाया गेलेले पिक पुन्हा पेरणी करून लावणी करणे शक्य नसल्याने शेतकर्यांचा खरीप हंगाम हातातून जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.जूलै महिन्यात बहुतांश शेतकर्यांची लावणी पुर्ण होत असतांना या वर्षी अजूनही भाताची खाचरे कोरडीच असल्याने वेळ असूनही शेतकर्यांना शेतीची कामे करता येत नाहीत.------------------------पेठ तालुक्यात जवळपास १०० टक्के भात व नागली बियाणे पेरणी झाली असून पाऊस लांबल्याने डोंगर उतारावर पेरणी केलेली रोपे पिवळी पडू लागली असून ज्या शेतकºयांना थोडीफार पाण्याची सोय आहे असे शेतकरी रोपे वाचवण्याची धडपड करत आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे.-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ------------------------------

टॅग्स :Nashikनाशिक