शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

जोरदार अतिवृष्टीमुळे भातपीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:50 IST

इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून, कवडदरा, घोटी खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी राऊतसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केली. सध्या भात सोंगणी हंगाम सुरू झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी; सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

कवडदरा : इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून, कवडदरा, घोटी खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी राऊतसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केली. सध्या भात सोंगणी हंगाम सुरू झाला आहे. दसरा, दिवाळी सण तोंडावर आला असून, करपा, मावा, तुडतुडे, टाका आदी रोगांमुळे आधीच नुकसान झालेल्या भातपिकाची ढगाळ हवामान व अधूनमधून बरसणाऱ्या अवकाळीमुळे भातपीक सोंगावे की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सोयाबीनदेखील काढणीला आले असून, काही शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले भातपीक तसेच सोयाबीन पावसाने भिजले आहे, तर सोंगलेला भात सडण्याची स्थिती निर्माण झाली असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जातो की काय या विचाराने शेतकरी धास्तावला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच विमा कंपन्यांनीही सरसकट पीकविमे मंजूर करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  यावेळी भाजप इगतपुरी तालुका उपाध्यक्ष रमेश निसरड, घोटी खु. सरपंच कैलास फोकणे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ रोंगटे, भाऊराव रोंगटे, सावळीराम रोंगटे, विशाल भोईर, सुरेश बर्डे, भास्कर रोंगटे, संतोष रोंगटे, बाळू रोंगटे, बाळासाहेब कलवर, सतीश फोकणे, चंद्रभान फोकणे, सुभाष फोकणे, तुकाराम शिंगोटे, शरद फोकणे, रुंजा फोकणे उपस्थित होते.

राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार अतिवृष्टी होत आहे. यामुळे आधीच रोगराईमुळे खराब झालेले शेतातील भात अतिवृष्टीमुळे पूर्णत; पाण्यात बुडाले, तर सोंगणीयोग्य असलेले भाताचे उभे पीक आडवे पडले असून, यात भातपिकाची नासाडी झाल्याने शेतकरी मात्र धास्तावले आहेत. पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी कमी पाण्यावर येणारा हळा भात सोंगावा की पंचनामा होईपर्यंत वाट पहावी हाही प्रश्न उभा राहिला आहे. सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी.- रमेश निसरड, नुकसानग्रस्त शेतकरी 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी