शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सेवापुस्तिका गहाळ प्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक घेणार आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 14:02 IST

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी विशेष बैठक बोलविली आहे. बैठकीला राज्यभरातील मुख्य वनसंरक्षकांसह उपवनसंरक्षकांंना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते.

ठळक मुद्देसेवापुस्तिकेची शोधाशोध ‘पुर्व-पश्चिम’च्या दिशेने सुरू सेवानिवृत्तांनाही ‘वाईट’ अनुभवधाबे दणाणले; माहितीची जुळवाजुळव

नाशिक : येथील वनविभागात कार्यरत असताना मयत झालेल्या एका वनरक्षकाची सेवापुस्तिका गहाळ झाल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्यस्तरावर या प्रकारणाची गंभीर दखल घेतली गेली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील वन कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अशाचप्रकारे शासकिय दप्तरांमधून गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वनविभागाच्या सचिवांच्या आदेशानुसार नागपूरला या आठवड्यात याबाबत आढावा घेण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी विशेष बैठक बोलविली आहे. बैठकीला राज्यभरातील मुख्य वनसंरक्षकांसह उपवनसंरक्षकांंना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते.वनविभागात १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर काही वर्षे गैरहजर राहून मयत झालेलेवनरक्षक चंद्रकांत बन्सीलाल पवार यांच्या सेवापुस्तिकेचा शोध लागत नव्हता. यामुळे त्यांच्या वारसांना सतत वनविभागाच्या कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहे. याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली आणि सेवापुस्तिकेची शोधाशोध ‘पुर्व-पश्चिम’च्या दिशेने सुरू झाली. पवार यांची सेवापुस्तिका १९९६ साली पश्चिम विभागाकडे पाठविल्याची नोंद अखेर पूर्व विभागाच्या दप्तरी आढळून आली.नाशिक पश्चिम वनविभागाच्या इगतपुरी परिक्षेत्रातील काळुस्ते गावात वनरक्षक पदावर कार्यरत असताना चंद्रकांत बन्सीलाल पवार यांचे २९ एप्रिल २०१६ साली निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. पवार हे १९८३ साली वनखात्यात वनरक्षक या पदावर नोकरीस लागले. पूर्व विभागाच्या नांदगाव परिक्षेत्रात कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची बदली १९९६ साली पश्चिम विभागात झाली. दरम्यान, १९९६ साली डिसेंबर महिन्याअखेरीस ते थेट वीस वर्षे गैरहजर राहिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याकडे तत्कालीन अधिकाºयांकहून तेव्हा दुर्लक्ष केले गेले आणि गुंता अधिकच वाढला. दरम्यान, ४ आॅक्टोबर १९९६ साली पवार यांची सेवापुस्तिका पश्चिम विभागाकडे पूर्व विभागाकडून पाठविण्यात आल्याची नोंद जावक नोंदवहीत मिळून आली . यामुळे सेवापुस्तिका पश्चिम विभागाकडून यानंतर गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले.सेवानिवृत्तांनाही ‘वाईट’ अनुभववनरक्षकांच्याच नव्हे तर उपवनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठांच्या सेवापुस्तिका गायब असल्याची चर्चा वनविभागात दबक्या आवाजात सुरू आहे. कर्मचारी,अधिकाºयांच्या मिळून सुमारे दोनशे सेवापुस्तिका हरविल्याचे समजते. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचा-यांना प्रशासकीय गलथान कारभाराचा ‘वाईट’ अनुभव येत आहे.धाबे दणाणले; माहितीची जुळवाजुळवनागपूरला होणा-या बैठकीला अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता स्वत: उपस्थित राहणार आहेत. गुप्ता हे प्रत्येक जिल्ह्याच्या उपवनसंरक्षकांकडून सेवापुस्तिकांची माहिती जाणून घेणार असल्याचे समजते. त्यामुळे सध्या अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकnagpurनागपूर