शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उधळले महाशिवआघाडीचे मनसुबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:31 IST

बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.

नाशिक : बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.शिवसेनेला सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या दहा ते बारा फुटिरांची साथ होती, तर त्यांना प्रामुख्याने कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि मनसेचे पाठबळ मिळणार होते. त्यातील मनसेला सुरुवातीपासूनच बाजूला ठेवण्यात भाजपला यश मिळाले होते. त्यासाठी राज ठाकरे यांच्याशी भाजपच्या प्रदेश नेत्यांनी चर्चा केली आणि त्यांना यश मिळाले. राज ठाकरे यांनी निवडणुकीत भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळेल किंवा नाही याविषयी शंका होती.मनसेपाठोपाठ भाजपने कॉँग्रेसला गळाला लावण्यासाठी चर्चा केली. त्यांना उपमहापौरपदासाठी आमिष दिल्याने वातावरण बिघडवले. मुळातच कॉँग्रेस पक्षात दोन गट होते. त्यातच उपमहापौरपदाच्या वादावरून सेना आणि कॉँग्रेसमध्ये बिनसले अखेरीस कॉँग्रेसने सेनेला सोडून भाजपला पूरक भूमिका घेतली. सर्वांत मोठी बंडखोरांची अडचणदेखील सोडविण्यात यश आले.साम-दाम-दंड-भेद नितीचा वापरभाजपने बंडखोरांना चुचकारले. साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर केला खरा, परंतु शिवसेनेचे गणित जुळत नसल्याने मूळ पक्षाशी प्रतारणा करून कारवाईला सामोरे जावे लागण्यापेक्षा पक्षाबरोबर राहिल्याचे फळ मिळेल असे बंडखोरांना समजावण्यात आल्याने प्रश्न मिटला.सानप यांच्याशीही भाजपची चर्र्चाभाजप सोडून शिवसेनेत गेलल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांना त्यांच्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठीच त्यांनी बंडाची तयारी करण्यास नगरसेवकांना सांगितले. मात्र, भाजपच्या नेत्यांनी सानप यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.उमेदवारीमुळेच भाजपतील बंड झाले थंडमनपा निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या संभाव्य नगरसेवकांची संख्या दहा ते बारा असल्याचे सांगितले जात होते. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करताना सानप समर्थक नगरसेवक कमलेश बोडके यांनी तर थेट शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी (दि.२२) ते थेट भाजपतच असल्याचा दावा करू लागले. भाजपात बाहेरून आलेल्यांनाच सत्तापदे दिली जात आहे. पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी होती आणि ती पूर्ण झाल्याने भाजपबरोबरच असल्याचा दावा बोडके यांनी केला. निवडणुकीच्या वेळी बोडके, मच्छिंद्र सानप आणि तत्सम सर्वच कथित बंडखोर नगरसेवक एकाच वेळी दाखल झाले.सर्वच पक्षांतराजी-नाराजीचे वातावरणमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांत गटबाजीचे वातावरण होते. भाजपने ज्येष्ठ नगरसेवकाला न्याय दिल्याचे स्वागत होत असताना काही नगरसेवक उमेदवारीत डावलल्याने नाराजी व्यक्त करीत होते, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये पाठिंबा शिवसेनेला द्यायचा की भाजपला यावरून दोन गट पडले होते. एका गटाने दुसºया नगरसेवकांना अंधारात ठेवून बोलणी केल्याने त्याविषयीचे पडसाद पक्षात उमटले. मनसेतदेखील भाजपला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस