शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

उधळले महाशिवआघाडीचे मनसुबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:31 IST

बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.

नाशिक : बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.शिवसेनेला सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या दहा ते बारा फुटिरांची साथ होती, तर त्यांना प्रामुख्याने कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि मनसेचे पाठबळ मिळणार होते. त्यातील मनसेला सुरुवातीपासूनच बाजूला ठेवण्यात भाजपला यश मिळाले होते. त्यासाठी राज ठाकरे यांच्याशी भाजपच्या प्रदेश नेत्यांनी चर्चा केली आणि त्यांना यश मिळाले. राज ठाकरे यांनी निवडणुकीत भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळेल किंवा नाही याविषयी शंका होती.मनसेपाठोपाठ भाजपने कॉँग्रेसला गळाला लावण्यासाठी चर्चा केली. त्यांना उपमहापौरपदासाठी आमिष दिल्याने वातावरण बिघडवले. मुळातच कॉँग्रेस पक्षात दोन गट होते. त्यातच उपमहापौरपदाच्या वादावरून सेना आणि कॉँग्रेसमध्ये बिनसले अखेरीस कॉँग्रेसने सेनेला सोडून भाजपला पूरक भूमिका घेतली. सर्वांत मोठी बंडखोरांची अडचणदेखील सोडविण्यात यश आले.साम-दाम-दंड-भेद नितीचा वापरभाजपने बंडखोरांना चुचकारले. साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर केला खरा, परंतु शिवसेनेचे गणित जुळत नसल्याने मूळ पक्षाशी प्रतारणा करून कारवाईला सामोरे जावे लागण्यापेक्षा पक्षाबरोबर राहिल्याचे फळ मिळेल असे बंडखोरांना समजावण्यात आल्याने प्रश्न मिटला.सानप यांच्याशीही भाजपची चर्र्चाभाजप सोडून शिवसेनेत गेलल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांना त्यांच्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठीच त्यांनी बंडाची तयारी करण्यास नगरसेवकांना सांगितले. मात्र, भाजपच्या नेत्यांनी सानप यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.उमेदवारीमुळेच भाजपतील बंड झाले थंडमनपा निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या संभाव्य नगरसेवकांची संख्या दहा ते बारा असल्याचे सांगितले जात होते. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करताना सानप समर्थक नगरसेवक कमलेश बोडके यांनी तर थेट शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी (दि.२२) ते थेट भाजपतच असल्याचा दावा करू लागले. भाजपात बाहेरून आलेल्यांनाच सत्तापदे दिली जात आहे. पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी होती आणि ती पूर्ण झाल्याने भाजपबरोबरच असल्याचा दावा बोडके यांनी केला. निवडणुकीच्या वेळी बोडके, मच्छिंद्र सानप आणि तत्सम सर्वच कथित बंडखोर नगरसेवक एकाच वेळी दाखल झाले.सर्वच पक्षांतराजी-नाराजीचे वातावरणमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांत गटबाजीचे वातावरण होते. भाजपने ज्येष्ठ नगरसेवकाला न्याय दिल्याचे स्वागत होत असताना काही नगरसेवक उमेदवारीत डावलल्याने नाराजी व्यक्त करीत होते, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये पाठिंबा शिवसेनेला द्यायचा की भाजपला यावरून दोन गट पडले होते. एका गटाने दुसºया नगरसेवकांना अंधारात ठेवून बोलणी केल्याने त्याविषयीचे पडसाद पक्षात उमटले. मनसेतदेखील भाजपला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस