शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

उधळले महाशिवआघाडीचे मनसुबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:31 IST

बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.

नाशिक : बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.शिवसेनेला सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या दहा ते बारा फुटिरांची साथ होती, तर त्यांना प्रामुख्याने कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि मनसेचे पाठबळ मिळणार होते. त्यातील मनसेला सुरुवातीपासूनच बाजूला ठेवण्यात भाजपला यश मिळाले होते. त्यासाठी राज ठाकरे यांच्याशी भाजपच्या प्रदेश नेत्यांनी चर्चा केली आणि त्यांना यश मिळाले. राज ठाकरे यांनी निवडणुकीत भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळेल किंवा नाही याविषयी शंका होती.मनसेपाठोपाठ भाजपने कॉँग्रेसला गळाला लावण्यासाठी चर्चा केली. त्यांना उपमहापौरपदासाठी आमिष दिल्याने वातावरण बिघडवले. मुळातच कॉँग्रेस पक्षात दोन गट होते. त्यातच उपमहापौरपदाच्या वादावरून सेना आणि कॉँग्रेसमध्ये बिनसले अखेरीस कॉँग्रेसने सेनेला सोडून भाजपला पूरक भूमिका घेतली. सर्वांत मोठी बंडखोरांची अडचणदेखील सोडविण्यात यश आले.साम-दाम-दंड-भेद नितीचा वापरभाजपने बंडखोरांना चुचकारले. साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर केला खरा, परंतु शिवसेनेचे गणित जुळत नसल्याने मूळ पक्षाशी प्रतारणा करून कारवाईला सामोरे जावे लागण्यापेक्षा पक्षाबरोबर राहिल्याचे फळ मिळेल असे बंडखोरांना समजावण्यात आल्याने प्रश्न मिटला.सानप यांच्याशीही भाजपची चर्र्चाभाजप सोडून शिवसेनेत गेलल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांना त्यांच्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठीच त्यांनी बंडाची तयारी करण्यास नगरसेवकांना सांगितले. मात्र, भाजपच्या नेत्यांनी सानप यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.उमेदवारीमुळेच भाजपतील बंड झाले थंडमनपा निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या संभाव्य नगरसेवकांची संख्या दहा ते बारा असल्याचे सांगितले जात होते. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करताना सानप समर्थक नगरसेवक कमलेश बोडके यांनी तर थेट शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी (दि.२२) ते थेट भाजपतच असल्याचा दावा करू लागले. भाजपात बाहेरून आलेल्यांनाच सत्तापदे दिली जात आहे. पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी होती आणि ती पूर्ण झाल्याने भाजपबरोबरच असल्याचा दावा बोडके यांनी केला. निवडणुकीच्या वेळी बोडके, मच्छिंद्र सानप आणि तत्सम सर्वच कथित बंडखोर नगरसेवक एकाच वेळी दाखल झाले.सर्वच पक्षांतराजी-नाराजीचे वातावरणमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांत गटबाजीचे वातावरण होते. भाजपने ज्येष्ठ नगरसेवकाला न्याय दिल्याचे स्वागत होत असताना काही नगरसेवक उमेदवारीत डावलल्याने नाराजी व्यक्त करीत होते, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये पाठिंबा शिवसेनेला द्यायचा की भाजपला यावरून दोन गट पडले होते. एका गटाने दुसºया नगरसेवकांना अंधारात ठेवून बोलणी केल्याने त्याविषयीचे पडसाद पक्षात उमटले. मनसेतदेखील भाजपला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस