शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

जिल्ह्यात क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:02 IST

गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर वाहनाच्या क्षमतेहून अधिक ऊस वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रानमळा परिसरात गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री डबल ट्रॉली लावून उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअपघातांना निमंत्रण : प्रादेशिक परिवहन कार्यालय कारवाईबाबत ढिम्म

निफाड- पिंपळगाव रस्त्यावर मागील दोन, तीन वर्षांत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे शंभरहून अधिक अपघात झाले आहेत. यात काहींना जीव गमवावा लागला तर काही अपंग झाले आहेत. तरीही रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. परिसरात मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्यात सहा अपघात झाले. त्यात ३ जणांना जीव गमवावा लागला होता. तर ३ जण अजूनही त्रास सहन करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षाच्या चिमुरडीला आपले पाय व वडील गमवावे लागले. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या अपघातांची नोंददेखील घेत नसल्याने सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहेकारखाना प्रशासनाचे दुर्लक्षच....वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात नाही. कारखाना प्रशासनाचा वचक ट्रॅक्टरचालकांवर नसल्याने बेफिकीर बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जाते. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात. तरीही कारखाना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आले आहे.सुरक्षासप्ताह केवळ दिखाऊउप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताह छायाचित्रांपुरता साजरा केला जातो, असे दिसते आहे. या कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्‍टर, ट्रेलरला रेडियम पट्ट्या लावून हा सप्ताह साजरा केला जातो; मात्र आजही या ऊस वाहतूक तसेच इतर वाहनांकडून सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले जात नाही. असे असतानाही या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसून येत नाही.अवजड वाहतुकीचे निकषछोटे टेम्पो - १ ते ३ टनमोठे टेम्पो - ३ ते ९ टन६ चाकी ट्रक - १० टनट्रॅक्टर -१४ ते १५ टन१० चाकी ट्रक - १७ टन१२ चाकी ट्रक - २२ टन१४ चाकी ट्रक - २७ टनओव्हरलोडिंग रोखण्याची कोणतीच यंत्रणा आरटीओकडे नाही. संपूर्ण जिल्ह्यात हा गंभीर प्रश्न आहे, तर तपासणी करण्यासाठीदेखील पुरेशी पथके नाहीत. जी पथके आहेत, त्या पथकांच्या कारवाया कागदोपत्रीच असतात. चिरीमिरीमुळे ठोस कारवाया होत नसल्याने ओव्हरलोडिंग राजरोस सुरूच आहे.- उद्धवराजे शिंदे, पिंपळगाव बसवंतअपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार होतात. दोन ट्रॉली एका ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये उसाची आणि इतरही वाहतूक करणे बेकायदेशीर आहे; मात्र सर्रास ही वाहतूक सुरू असून, आरटीओकडून ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुरू असलेली ही जीवघेणी वाहतूक बंद का केली जात नाही, हा प्रश्नच आहे.- प्रशांत मोरे, रानमळा, पिंपळगाव.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात