शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

जिल्ह्यात क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:02 IST

गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर वाहनाच्या क्षमतेहून अधिक ऊस वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रानमळा परिसरात गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री डबल ट्रॉली लावून उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअपघातांना निमंत्रण : प्रादेशिक परिवहन कार्यालय कारवाईबाबत ढिम्म

निफाड- पिंपळगाव रस्त्यावर मागील दोन, तीन वर्षांत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे शंभरहून अधिक अपघात झाले आहेत. यात काहींना जीव गमवावा लागला तर काही अपंग झाले आहेत. तरीही रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. परिसरात मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्यात सहा अपघात झाले. त्यात ३ जणांना जीव गमवावा लागला होता. तर ३ जण अजूनही त्रास सहन करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षाच्या चिमुरडीला आपले पाय व वडील गमवावे लागले. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या अपघातांची नोंददेखील घेत नसल्याने सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहेकारखाना प्रशासनाचे दुर्लक्षच....वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात नाही. कारखाना प्रशासनाचा वचक ट्रॅक्टरचालकांवर नसल्याने बेफिकीर बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जाते. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात. तरीही कारखाना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आले आहे.सुरक्षासप्ताह केवळ दिखाऊउप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताह छायाचित्रांपुरता साजरा केला जातो, असे दिसते आहे. या कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्‍टर, ट्रेलरला रेडियम पट्ट्या लावून हा सप्ताह साजरा केला जातो; मात्र आजही या ऊस वाहतूक तसेच इतर वाहनांकडून सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले जात नाही. असे असतानाही या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसून येत नाही.अवजड वाहतुकीचे निकषछोटे टेम्पो - १ ते ३ टनमोठे टेम्पो - ३ ते ९ टन६ चाकी ट्रक - १० टनट्रॅक्टर -१४ ते १५ टन१० चाकी ट्रक - १७ टन१२ चाकी ट्रक - २२ टन१४ चाकी ट्रक - २७ टनओव्हरलोडिंग रोखण्याची कोणतीच यंत्रणा आरटीओकडे नाही. संपूर्ण जिल्ह्यात हा गंभीर प्रश्न आहे, तर तपासणी करण्यासाठीदेखील पुरेशी पथके नाहीत. जी पथके आहेत, त्या पथकांच्या कारवाया कागदोपत्रीच असतात. चिरीमिरीमुळे ठोस कारवाया होत नसल्याने ओव्हरलोडिंग राजरोस सुरूच आहे.- उद्धवराजे शिंदे, पिंपळगाव बसवंतअपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार होतात. दोन ट्रॉली एका ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये उसाची आणि इतरही वाहतूक करणे बेकायदेशीर आहे; मात्र सर्रास ही वाहतूक सुरू असून, आरटीओकडून ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुरू असलेली ही जीवघेणी वाहतूक बंद का केली जात नाही, हा प्रश्नच आहे.- प्रशांत मोरे, रानमळा, पिंपळगाव.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात