शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यात बारा हजारांहून अधिक बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:52 IST

पावसाळा सुरू होताच कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून, आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून १२ हजार ६९९ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

नाशिक : पावसाळा सुरू होताच कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून, आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून १२ हजार ६९९ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. त्यात २ हजार ८९३ बालके अतितीव्र कुपोषित म्हणून आढळून आले, तर ९ हजार ८०६ बालके मध्यम कुपोषित आहेत. या बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करून पोेषण आहार व वैद्यकीय उपचार केला जात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून सुमारे २५ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, प्रामुख्याने या तालुक्यांमध्येच कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असले तरी, आता मोठ्या प्रमाणात आदिवासींचे अन्यत्र स्थलांतर होऊ लागल्याने अन्य तालुक्यांमध्येही त्याचे प्रमाण दिसू लागले आहे. गेल्या महिन्यातच यासंदर्भात गावोगावी आरोग्य विभागाच्या वतीने बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात तीन लाख ८५ हजार ३५९ बालकांची तपासणी करण्यात येऊन त्यातील अतितीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची वर्गवारी करण्यात आली. त्यात १२ हजार ६९९ बालके कुपोषित आढळली आहेत. या बालकांना पोषण आहार व आरोग्य उपचार करून त्यांना सदृढ करण्यासाठी गावोगावी ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ग्रामविकास केंद्रांमध्ये दिवसभर कुपोषित बालकांना दाखल करून त्यांना दिवसातून सहा वेळा पोेषक आहार व वैद्यकीय उपचार केले जातात. एकात्मिक बालविकास विभागामार्फत ही केंद्रे चालविली जात असली तरी, कुपोषित बालकांसाठी येणारा खर्च पाहता त्याची तजवीज त्या त्या गावातील ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्याची तरतूद आहे. एका बालकामागे महिन्याला २ हजार १५० रुपये खर्च येत असल्याने जिल्ह्यातील २ हजार ५९९ ग्राम विकास केंद्रांमध्ये दाखल असलेल्या १० हजार ७०९ कुपोषित बालकांसाठी २५ लाख ७०० रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित सुमारे दोन हजार बालकांना त्यांच्या घरीच पोषण आहार व वैद्यकीय उपचार केला जात आहे. ग्राम बालविकास केंद्रात दाखल असलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांचे मध्यम कुपोषित बालकात वर्गवारी होईपर्यंत या बालकांना दररोज सकाळी ८ वाजता दाखल केले जाते व सायंकाळी ५ वाजता पालकांच्या स्वाधीन केले जाते. साधारणत: पावसाळ्याच्या तीन महिन्यांपर्यंत ही ग्राम विकास केंद्रे कार्यरत राहणार आहेत.नाशकात ८८६ बालके कुपोषितमुंबई, पुण्याशी स्पर्धा करणाऱ्या नाशिक महानगरपालिका हद्दीतही कुपोषित बालके आढळली आहेत. शहरातील १८ हजार २१२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असता, त्यात १५२ बालके अतितीव्र कुपोषित म्हणून, तर ७३४ बालके मध्यम कुपोषित आहेत. या बालकांसाठी १६४ ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यात ७५५ बालके दाखल करण्यात आली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक