शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

निधी कर्जखात्यात वर्ग न करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:14 IST

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत प्राप्त निधी हा लाभार्थ्यांच्या नावाने बँकेत जमा झाल्यानंतर काही बॅँकांकडून सदरची रक्कम कर्ज खात्यात परस्पर वर्ग करून घेतली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकिसान सन्मान : बॅँकांंना पत्र; वन कायद्यांतर्गत शेतकरीही योजनेस पात्र

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत प्राप्त निधी हा लाभार्थ्यांच्या नावाने बँकेत जमा झाल्यानंतर काही बॅँकांकडून सदरची रक्कम कर्ज खात्यात परस्पर वर्ग करून घेतली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संदर्भातील परिपत्रक अग्रणी बँकेने सर्व शाखांकडे पाठविले असून, अशा प्रकारची तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षाकडे तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे.काही शेतकऱ्यांची रक्कम कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अग्रणी बँकेकडे याबाबत प्रशासनाने विचारणा केली असता बँकांना अशा कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचे बँकेचे व्यवस्थापक बर्वे यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधून सदर रक्कम संबंधित शेतकºयांना देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अशा सूचना जिल्ह्णातील सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. वनकायद्यांतर्गत वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आलेले, परंतु नाव सातबारा सदरी नसलेले वनपट्टाधारक शेतकरीदेखील योजनेस पात्र आहेत. याबाबतच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना अद्याप वनपट्ट्यांचे वाटप झाले नाही अशांनाही वन पट्ट्यांचे वाटप झाल्यावर या योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनेबाबत काही तक्रार असल्यास शेतकºयांनी ०२५३-२३१५१७५ किंवा २३१५०८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.काही शेतकºयांच्या नावातील तांत्रिक चुकांमुळे बँकेत जमा केलेली रक्कम एनआयसीमार्फत परत काढण्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून लाभार्थी एकच असल्याबाबत खात्री संबंधित शेतकºयाच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याबाबत अहवाल पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या खात्यातून परत गेलेली रक्कम परत जमा करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.