नोकरभरतीसाठी तोंडी ‘परीक्षा’ रद्द
By Admin | Updated: June 10, 2014 01:03 IST2014-06-10T00:46:07+5:302014-06-10T01:03:13+5:30
नोकरभरतीसाठी तोंडी ‘परीक्षा’ रद्द

नोकरभरतीसाठी तोंडी ‘परीक्षा’ रद्द
नाशिक : राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरभरतीत लेखी परीक्षेसाठी तोंडी (मुलाखती) परीक्षा घेण्यात येतात. यापुढील काळात मात्र केवळ लेखी परीक्षेच्या व प्रत्यक्ष व्यवसाय परीक्षेतील गुणांच्या आधारेच थेट नोकरभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यासंदर्भात ५ जूनलाच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्णय घेतला आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशाच्या कोट्यातील गट ‘क’ व गट ‘ब’ अराजपत्रित पदे भरताना मौखिक परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकर पदभरतीसाठी मुलाखती न घेण्याबाबतचा निर्णय संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास घेता येईल. या निर्देशात सुधारणा करण्यात आली आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशाच्या कोट्यातील गट ‘क’ तसेच गट ‘ब’ (अराजपत्रित) मधील कोणत्याही पदाकरिता उमेदवाराची निवड करताना मौखिक (तोंडी) परीक्षा (मुलाखती) घेण्यात येऊ नये, असे शासननिर्णयात म्हटले आहे. या शासननिर्णयामुळे मुलाखतींच्या वेळी निवड मंडळाचे सदस्य गुण देताना काही वेळा वशिलेबाजी करण्याचे जे आरोप होत होते, ते आरोप आता होणार नाहीत.