शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

गावठाण विकासाच्या कामाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:52 PM

स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पॉइंट वंदे मातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देशाहू खैरे यांचे पत्र। स्मार्ट सिटी-मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी

नाशिक : स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पॉइंट वंदे मातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (दि.१०) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र दिले आहे. अर्थात, स्मार्ट सिटी कंपनीने सदरचे काम अवघे दोन महिन्यांत पूर्ण करून परिसरातील नागरिक आणि व्यापाºयांना दिलासा देण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.स्मार्ट सिटीची कामे नेहमीच वादग्रस्त ठरली आहेत. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्टरोड गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गाजत आहे. अवघा एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लागला आणि खर्चदेखील सतरा कोटींच्या वर गेला आहे. त्यानंतरदेखील अपेक्षित काम पूर्ण झालेले नाही. त्यानंतर गेल्यावर्षी मध्येच कंपनीने गावठाण विकासाची कामे हाती घेतली आहेत. त्यात रस्त्याची विकासकामे सुरू झाली असून, आता वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीने नियोजन केल्यानंतर पोलीस यंत्रणेनेदेखील अधिसूचना जारी केली आहे. तथापि, आता या कामविषयी शंका व्यक्त केली जात असतानाच आता हे काम तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक असलेल्या शाहू खैरे यांनी केली आहे.स्मार्ट सिटीतील अभियंत्यांना मुळातच या भागातील गटारींची माहिती नाही. तसेच महापालिकेच्या अभियंत्याचा आणि कंपनीच्या अभियंत्याचा समन्वय नाही. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मुळातच या मार्गाच्या खालून अनेक नाले जात आहेत. भद्रकाली पंपिंग स्टेशन येथील काही नाले याच भागातून पुढे सरस्वती नाल्याला मिळतात आणि पुढेही अनेक नाले मिळतात. आता पावसाळा सुरू असताना अशाप्रकारचे काम सुरू केल्यानंतर पाणी साचून अनेक दुकानदार आणि नागरिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे काम सुरू करू नये, अशी मागणी खैरे यांनी केली आहे.शहरात मेनरोडसारख्या भागात पाणी साचत असल्याने स्मार्ट सिटी कंपनीने गटारीचे काम हाती घेतले. मात्र काम सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच काम बंद झाले. बाजारपेठेतूनच विरोध होत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आल्यामुळे व्यापारी बुचकळ्यात पडले आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच या भागाची पाहणी करून या भागात पाणी साचत असल्याने तातडीने कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या समन्वयातूनच हे काम होत आहे.- प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी