शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

कृषी विधेयकाबाबत विरोधकांकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:22 IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. हे विधेयक शेतकरी हिताचेच असून, विधेयकाबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून शेतकºयांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केला आहे.

ठळक मुद्देकेदा आहेर : भाजपाकडून शेतकऱ्यांची जनजागृती

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. हे विधेयक शेतकरी हिताचेच असून, विधेयकाबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून शेतकºयांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केला आहे.केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विधेयकावर राज्यभरात भाजपाच्या वतीने शेतकरी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्याचाच भाग म्हणून भाजपने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्यास सुरु केली. त्यावेळी आहेर बोलत होते.झाल्या. ते म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली आहेत. सरकारकडून किमान आधारभूत किमतीला केली जाणारी शेतमाल खरेदी यापुढेही चालूच राहणार असून काँग्रेससारख्या पक्षांनी या विधेयकांविरोधात सुरु केलेला प्रचार मतलबी आहे , शेतकºयांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या ४ वर्षांत शेतकºयांना पीक विम्यापोटी ७७ हजार कोटींची भरपाई मिळाली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. युपीए सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने या ३ विधेयकाच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आलेले आहे. शेतकºयांना आता आपला शेतीमाल कोठेही विकता येणार आहे. यापुढील काळात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गावपातळीवर करण्यात येणार असल्याने शेतकºयांना आपला माल बाजारातील परिस्थिती पाहून विक्रिसाठी आणता येणार आहे. कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची असून याबाबतचे वाद सोडविताना शेतकºयांचे हित जपले जाईल याला विधेयकात प्राधान्य देण्यात आले आहे. काँग्रेसची हरियाणात सत्ता असताना २००७ मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात शेतमाल विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. हाच काँग्रेस पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जिल्'ातील कोरोना काळातील सेवकार्याची पुस्तिका या वेळी प्रकाशित करण्यात आली. यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीष पलव, . सुनील बच्छाव, नंदकुमार खैरनार, भूषण कासलीवाल, प्रशांत जाधव , मीडिया सयोंजक प्रवीण अलाई, अमोल पवार ,प्रशांत गामणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सुनील बच्छाव यांनी केले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपा