शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्णांसाठी मंगळवारपासून प्रवेशाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 18:20 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देपुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) पासून प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातही दोन वर्षांपासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, यावर्षी प्रवेशप्रक्रियेतील तीन नियमित आणि एक विशेष फेरी झाल्यानंतर ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ अशा एकूण पाच फेºयांमध्ये जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.३०) जाहीर झाला असून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे  पुन्हा एकदा प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी राबविली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, दि. ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका घेऊन प्रवेश अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतरच दि. ९ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.

सात हजार जागा उपलब्धशहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अजूनही सहा ते सात हजार जागा उपलब्ध असून, त्या जागांवर पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा घसरल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत कमी होती. त्यामुळे पुरवणी परीक्षेसाठी २५ हजार विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यातील सहा हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना अकरावीसाठी प्रवेशाची अंतिम संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. अशी होईल प्रवेशफेरी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दि. ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान माहिती पुस्तिका घेऊन त्यानुसार प्रवेश अर्ज करता येणार असून, दि. ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयांना राखीव कोट्याच्या रिक्त जागा समर्पित करावी लागणार आहे. त्यानंतर उपलब्ध रिक्त जागांवर दि. ९ सप्टेंबरपासून ६० टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, तर १३ सप्टेंबरपासून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार असून, दि. १३ ते १४ सप्टेंबरदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. १६ सप्टेंबरला एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना कॉलेज निवडण्याची संधी दिली जाणार असून, दि. १६ ते १७ सप्टेंबर दरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी