शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाच्या पाणीप्रश्नावर विरोधकांचा दिखाऊपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:27 IST

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपाचा अपवाद वगळता सर्वपक्षीय राजकीय आंदोलने होत असली तरी, या आंदोलनातून निघणारा एकूणच निष्कर्ष पाहता कोणतीही शासकीय यंत्रणा आपल्या अखत्यारित पाणी न सोडण्याचा निर्णय घेऊ शकत नसल्याने शेवटचे अस्त्र म्हणून त्यासाठी थेट राज्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालणे हाच पर्याय असल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे.

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपाचा अपवाद वगळता सर्वपक्षीय राजकीय आंदोलने होत असली तरी, या आंदोलनातून निघणारा एकूणच निष्कर्ष पाहता कोणतीही शासकीय यंत्रणा आपल्या अखत्यारित पाणी न सोडण्याचा निर्णय घेऊ शकत नसल्याने शेवटचे अस्त्र म्हणून त्यासाठी थेट राज्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालणे हाच पर्याय असल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे. दुर्दैवाने सध्याचे आंदोलन पाहता ‘जखम पायाला व मलम डोक्याला’ लावण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका होऊ लागली आहे.  जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी पाटबंधारे महामंडळाने मंगळवारी जाहीर केल्यानंतर यासंदर्भात सर्वात प्रथम भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी न सोडण्याची भूमिका घेत सर्वपक्षीय बैठक बोलावली असता, त्यात कॉँग्रेस वगळता सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली. त्यात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. दोन्ही मार्ग योग्य असतानाही भाजपाला वगळून अन्य विरोधी पक्षांनी शहरात विविध मार्गांनी आंदोलने सुरू करून जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे खात्याला पत्रे देण्याचा सपाटा लावला आहे. रामकुंडात पाण्यात उतरण्याबरोबरच जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना घेराव घालण्यात आला आहे.  मुळात जिल्ह्यात राज्य सरकारातील एक मंत्री, सत्ताधारी पक्षाचे दोन खासदार, सत्ताधारी विरोधक मिळून पंधरा आमदार असून, या सर्वांनी पाणीप्रश्नावर पुढाकार घेऊन थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनाच साकडे घातल्यास त्यांची मध्यस्थीच नाशिकचे पाणी वाचवू शकणार आहे. न्यायालयाने जलदगतीने सुनावणी घेण्यास नकार दिला, तर पाटबंधारे महामंडळ जलसंपत्ती अधिनियम व उच्च न्यायालयाचा हवाला देत पाणी सोडण्यावर ठाम आहे, अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर आंदोलने करणे म्हणजे एक तर आंदोलकांना पाण्याच्या प्रश्नावर फक्त राजकारण करून भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्यातच रस असल्याचे दिसत आहे. अर्थात यात भाजपदेखील मागे नाही.राजकीय आंदोलनांचा फार्सगोदावरी महामंंडळाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच शासकीय यंत्रणेच्या हाती असून, राजकीय पक्षांची आंदोलने व त्यांची निवेदने फक्त संबंधित विभागाकडे पोहोचविण्याची जबाबदारी आहे. ही वस्तुस्थिती आंदोलने करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही ठाऊक आहे, परंतु तरीही निव्वळ नाशिककरांचे तारणहार म्हणून दिखाऊपणा केला जात आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणWaterपाणीMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस