शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

विरोधक आक्रमक : न्यायालयात जाण्याची तयारी; अडीचशे कोटींच्या रस्त्याचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:25 AM

रस्त्यांच्या घुसखोरीवर प्रशासनाचे मौन नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नाही तसेच कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अडीचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रस्त्यांची कामे मागील दाराने मंजूर करण्यात आली. त्यानंतर काही नगरसेवकांनी प्रशासनाला पत्र दिल्यानंतरदेखील त्याबाबत प्रतिउत्तर न दिल्याने काही नगरसेवकांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

ठळक मुद्देविरोधक आक्रमक : न्यायालयात जाण्याची तयारी; अडीचशे कोटींच्या रस्त्याचे गौडबंगालनाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नाही

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नाही तसेच कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अडीचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रस्त्यांची कामे मागील दाराने मंजूर करण्यात आली. त्यानंतर काही नगरसेवकांनी प्रशासनाला पत्र दिल्यानंतरदेखील त्याबाबत प्रतिउत्तर न दिल्याने काही नगरसेवकांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.गेल्या महिन्याच्या महासभेच्या पूर्वसंध्येला शहरात २५७ कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि तो ऐनवेळी जादा विषयात आणला आणि तो मागील दाराने आणून मंजूर केला. यासंदर्भात प्रमुख विरोधी पक्षांनी फारसा विरोध केला नाही, तर काही नगरसेवकांनी आक्षेप घेणारे आणि यासंदर्भात चौकशी झाली तर त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे पत्रही दिले होते. महापालिकेच्या नियमावलीनुसार महासभेच्या अगोदरच जी विषय पत्रिका प्रसिद्ध केली जाते. त्यात अशाप्रकारच्या पूर्वनियोजित विषयांचा समावेश होणे आवश्यक आहे. त्यानंतरही महत्त्वाचा विषय आला तर तीन दिवस अगोदर पूरवणी विषयपत्रिका देऊन विषय सर्वांच्या माहितीसाठी देणे आवश्यक आहे. अशा प्रक्रियेनंतरही महापालिकेकडे आपत्कालीन विषय आलाच तर तो महासभेत जादा विषयात मांडता येऊ शकतो. परंतु २५७ कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करणे हे एखाद्या आपत्कालीन घटनेसारखे नसल्याने हा विषय मांडल्यानंतर त्यास आक्षेप घेण्यात आला. गोंधळात टाकणारा विषयमहापालिकेच्या या प्रस्तावात अनेक प्रकारचा गोंधळ अगोदरच असून, पाचशे मीटर रस्त्यासाठी चक्क साडेसात कोटी कोटी रुपयांची तरतूद दर्शविण्यात आली आहेत. ही रक्कम बघून अनेक जण आवाक झाले असून, एका तर सत्तारूढ पक्षाच्या एका नगरसेवकाने तर या रस्त्याला विरोध करून घरचा आहेर दिला आहे.सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेच्या अंदाजपत्रकात यासंदर्भात कोणतीही तरतूद नसतानादेखील अडीचशे कोटी रुपयांची कामे कशी होणार हा प्रश्न होता. लेखा परीक्षकांनी त्याबाबत प्रशासनाला पत्र दिले, परंतु त्याचा उपयोग झालेला नाही.