शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मुक्त विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 01:31 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्रच्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा व मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा यासारखे प्रश्न विचारून नवीन वादाला तोंड फोडले आहे. विद्यापीठाने या प्रश्नांमधून संविधान विरोधी मनुस्मृतीचा उदात्तीकरण, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसफ) या विद्यार्थी संघटनेने केला आहे. या प्रश्नांविषयी एआयएसफ कडून विद्यापीठाविरोधात निषेध व्यक्त करतानाच गुरुवारी राज्यभरात यासंबंधित प्रश्नपत्रिकांची होळी करण्याचा इशाराही दिला आहे.

ठळक मुद्देमनुस्मृती- शिवाजी महाराज यांच्यासंदर्भातील प्रश्न  राज्यशास्त्र परीक्षेतील प्रश्नांवर एआयएसएफचा आक्षेप

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्रच्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा व मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा यासारखे प्रश्न विचारून नवीन वादाला तोंड फोडले आहे. विद्यापीठाने या प्रश्नांमधून संविधान विरोधी मनुस्मृतीचा उदात्तीकरण, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसफ) या विद्यार्थी संघटनेने केला आहे. या प्रश्नांविषयी एआयएसफ कडून विद्यापीठाविरोधात निषेध व्यक्त करतानाच गुरुवारी राज्यभरात यासंबंधित प्रश्नपत्रिकांची होळी करण्याचा इशाराही दिला आहे.

मुक्त विद्यापीठ पदवी परीक्षेत मंगळवारी (दि. १२) राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्र. २ (अ) न प्रश्न क्र. ३ (ई) या प्रश्नांवर एआयएसएफने आक्षेप नोंदविला आहे. मुक्त विद्यापीठात भारतीय संविधान विरोधी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आल्याचा आरोप संघटनेचे राज्याध्यक्ष विराज देवांग यांनी केला असून, यासंदर्भात विद्यापीठाचे विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांना निवेदन देत राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेटच झाली नसल्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ जुलै २०१८ दिलेल्या निकालाचा दाखलाही या निवेदनातून देण्यात आला असून, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृती संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी असल्याचे नमूद करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास सांगून बदनामी केली जात असल्याचा आरोपही एआयएसएफने केला आहे. यावेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष देवांग, शहराध्यक्ष जयंत विषयपुष्प, शहरसचिव प्राजक्ता कापडने, कैवल्य चंद्रात्रे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

--

विद्यापीठाने जाहीर माफी मागावी

विद्यापीठाने मनुस्मृती, तसेच शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिणारी अभ्यासक्रम समिती रद्द करावी व अभ्यासक्रमातील इतिहासद्रोही, तसेच घटनाविरोधी लिखाण तत्काळ मागे घेऊन, प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.

---

 

प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्यास कोणता प्रश्न काढला ते माहीत असते. इतर कोणाला त्याची माहिती नसते. त्यामुळे झालेल्या प्रकारात पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांना विचारणा करून विद्यापीठ योग्य कारवाई करील, मूल्यांकन विभाग यापुढे अशी चूक होणार नाही, याची खबरदारी घेईल .- डॉ. सज्जन थूल, मूल्यांकन विभागप्रमुख

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण