शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वाहतूक शाखेकडून केवळ दुचाकी वाहनधारक टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:30 IST

वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पंचवटी : वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील बेशिस्त रिक्षाचालक थांबा नसताना रिक्षा थांबविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे तसेच अन्य चारचाकी वाहनचालक भररस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा करीत असले तरी त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने वाहतुकीचे नियम केवळ दुचाकी वाहनधारकांसाठी आहे का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. गत काही दिवसांपासून नाशिक शहरात सर्वत्र वाहतूक शाखेचे पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य दुचाकीवाहनधारकांना टार्गेट केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्त रिक्षाचालकांची मुजोरी  शहरातील विविध मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांवर बेशिस्त रिक्षाचालकांकडून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, थांबा नसताना रिक्षा थांबविणे तर मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरातील रस्त्यावर चारचाकी उभ्या करणे, होळकर पुलावर चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जात असली तरी वाहतूक शाखेकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.    ऐरवी रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली म्हणून पोलिसांकडून खाकीचा धाक दाखवून दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाइ केली जाते मग वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत नियमांची पायमल्ली करणाºया वाहनचालकांना मोकळीक का असा सवाल नागरिकांनी केला आहे. शासनाच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढावी यासाठी वाहतूक शाखा दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सक्तीची मोहीम राबवित आहे. पोलीस व जनतेत वाद शासनाच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढावी यासाठी वाहतूक शाखा दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सक्तीची मोहीम राबवित आहे. त्यामुळे पोलीस व सर्वसामान्य जनता यांच्यात वाद होत असल्याचे चित्र आहे. वारंवार दुचाकीवर कारवाईमुळे दुचाकी चालवावी की नाही हा प्रश्न चालकांना पडत आहे. पोलीसांच्या या त्रासाचा नागरिकांना कंटाळा आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस