शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

वाहतूक शाखेकडून केवळ दुचाकी वाहनधारक टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:30 IST

वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पंचवटी : वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील बेशिस्त रिक्षाचालक थांबा नसताना रिक्षा थांबविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे तसेच अन्य चारचाकी वाहनचालक भररस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा करीत असले तरी त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने वाहतुकीचे नियम केवळ दुचाकी वाहनधारकांसाठी आहे का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. गत काही दिवसांपासून नाशिक शहरात सर्वत्र वाहतूक शाखेचे पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य दुचाकीवाहनधारकांना टार्गेट केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्त रिक्षाचालकांची मुजोरी  शहरातील विविध मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांवर बेशिस्त रिक्षाचालकांकडून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, थांबा नसताना रिक्षा थांबविणे तर मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरातील रस्त्यावर चारचाकी उभ्या करणे, होळकर पुलावर चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जात असली तरी वाहतूक शाखेकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.    ऐरवी रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली म्हणून पोलिसांकडून खाकीचा धाक दाखवून दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाइ केली जाते मग वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत नियमांची पायमल्ली करणाºया वाहनचालकांना मोकळीक का असा सवाल नागरिकांनी केला आहे. शासनाच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढावी यासाठी वाहतूक शाखा दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सक्तीची मोहीम राबवित आहे. पोलीस व जनतेत वाद शासनाच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढावी यासाठी वाहतूक शाखा दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सक्तीची मोहीम राबवित आहे. त्यामुळे पोलीस व सर्वसामान्य जनता यांच्यात वाद होत असल्याचे चित्र आहे. वारंवार दुचाकीवर कारवाईमुळे दुचाकी चालवावी की नाही हा प्रश्न चालकांना पडत आहे. पोलीसांच्या या त्रासाचा नागरिकांना कंटाळा आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस