शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांच्या भरवशावर एसटी त्यांनाच दिला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:21 IST

नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ नफ्यात आहेच कोठे मग असे असताना प्रवाशांचे हित आणि सामाजिक बांधीलकी धाब्यावर बसवून व्यवसायिक वृत्तीने महामंडळाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतोट्याचे कारण: वर्षानुवर्ष कमवलेल्या नफ्याचे काय?

नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ नफ्यात आहेच कोठे मग असे असताना प्रवाशांचे हित आणि सामाजिक बांधीलकी धाब्यावर बसवून व्यवसायिक वृत्तीने महामंडळाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य परिवहन महामंडळाची मक्तेदारी सुरूवातीला ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात होती. १९९२ च्या अगोदर ही मक्तेदारी असताना महामंडळाला नफ्या तोट्याचे गणित कधी आठवले नाही आणि त्यानंतर मात्र शहरातील बसवाहतूक ही आपली जबाबदारी नाहीच, असे सांगून हात झटकण्यास महामंडळाने सुरूवात केली. त्यानंतर नाशिकसह अन्य महापालिकांना वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात येऊन ही जबाबदारी आमची नाहीच असे ठसविण्याची नाहीच असे इशारे देण्यास सुरूवात झाली. महामंडळाची सूत्रे उत्तमराव खोब्रागडे यांच्याकडे असताना तर थेट वृत्तपत्रात नोटिसा देऊन आता बस सेवा चालविणार नसल्याचे निर्वाणीचे इशारे देण्यात आले. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना रोखल्याने नाशिक शहरात तरी त्यांच्या इशाºयांचा काही परिणाम झाला नाही आता महापालिका राजकिय दबावामुळे ही सेवा चालविण्यास तयार झाली असताना त्याच्या सेवेची प्रतिक्षा न करताही बस सेवाच सुरू करायची नाही, इतकीमुजोरी महामंडळ का करीत आहे, असा प्रश्न आहे.नाशिक शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली हे प्रवाशी घटण्याचे कारण सांगितले जात असले तरी शहरबा' सेवेत देखील खासगी सेवेचे आव्हान नाही काय, मग तेथे सेवा बंद करणे शक्य आहे काय, असाही प्रश्न केला जात आहे.मुळातच ही प्रवाशासाठी बस सेवा चालवणे ही एकमेव जबाबदारी महामंडळाकडे आहे. महापालिकांकडे रस्ते,पाणी, गटारी ही सर्व मुलभूत सेवांची कामे आहे. ती करता करता त्यांना नाकीनव येतात अशास्थितीत ते बस सेवा चालविण्यास तयार असताना त्याची वाट न बघता शहरात बस सेवाच चालविणा-यास नकार देणा-या महामंडळाच्या कारभाराची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.महामंडळाने शहर बस वाहतूक बंद करण्यासाठी लॉक डाऊन हे निमित्त शोधले असले तरी यापूर्वी ही सेवा बंद करण्यासाठी किंवा नागरीकांनी तक्रारी ही सेवा महापालिकेस सुरू करण्यास भाग पाडावे यासाठी अनेक भागातील बस फे-याच बंद केल्या. शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून येणा-या नागरीकांचे त्यामुळे हाल झाले. विद्यार्थ्यांना कॉलेजला जाणे अडचणीचे ठरले. पासचे पैसे भरूनवाया गेले. शहरातल्या उपनगरात अनेक भागात फ्रिक्वेंसी कमी केली. त्यामुळे नागरीकांचे हाल झाले. प्रवाशांची सोय नव्हे तर जाणिवपूर्वक हाल करणा-या महामंडळाची सेवा तरी नक्की कोणासाठी चालते असाही प्रश्न आता प्रवासी करीत आहेत.

 

 

टॅग्स :Bus Driverबसचालकcorona virusकोरोना वायरस बातम्या