शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

ज्यांच्या भरवशावर एसटी त्यांनाच दिला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:21 IST

नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ नफ्यात आहेच कोठे मग असे असताना प्रवाशांचे हित आणि सामाजिक बांधीलकी धाब्यावर बसवून व्यवसायिक वृत्तीने महामंडळाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतोट्याचे कारण: वर्षानुवर्ष कमवलेल्या नफ्याचे काय?

नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ नफ्यात आहेच कोठे मग असे असताना प्रवाशांचे हित आणि सामाजिक बांधीलकी धाब्यावर बसवून व्यवसायिक वृत्तीने महामंडळाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य परिवहन महामंडळाची मक्तेदारी सुरूवातीला ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात होती. १९९२ च्या अगोदर ही मक्तेदारी असताना महामंडळाला नफ्या तोट्याचे गणित कधी आठवले नाही आणि त्यानंतर मात्र शहरातील बसवाहतूक ही आपली जबाबदारी नाहीच, असे सांगून हात झटकण्यास महामंडळाने सुरूवात केली. त्यानंतर नाशिकसह अन्य महापालिकांना वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात येऊन ही जबाबदारी आमची नाहीच असे ठसविण्याची नाहीच असे इशारे देण्यास सुरूवात झाली. महामंडळाची सूत्रे उत्तमराव खोब्रागडे यांच्याकडे असताना तर थेट वृत्तपत्रात नोटिसा देऊन आता बस सेवा चालविणार नसल्याचे निर्वाणीचे इशारे देण्यात आले. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना रोखल्याने नाशिक शहरात तरी त्यांच्या इशाºयांचा काही परिणाम झाला नाही आता महापालिका राजकिय दबावामुळे ही सेवा चालविण्यास तयार झाली असताना त्याच्या सेवेची प्रतिक्षा न करताही बस सेवाच सुरू करायची नाही, इतकीमुजोरी महामंडळ का करीत आहे, असा प्रश्न आहे.नाशिक शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली हे प्रवाशी घटण्याचे कारण सांगितले जात असले तरी शहरबा' सेवेत देखील खासगी सेवेचे आव्हान नाही काय, मग तेथे सेवा बंद करणे शक्य आहे काय, असाही प्रश्न केला जात आहे.मुळातच ही प्रवाशासाठी बस सेवा चालवणे ही एकमेव जबाबदारी महामंडळाकडे आहे. महापालिकांकडे रस्ते,पाणी, गटारी ही सर्व मुलभूत सेवांची कामे आहे. ती करता करता त्यांना नाकीनव येतात अशास्थितीत ते बस सेवा चालविण्यास तयार असताना त्याची वाट न बघता शहरात बस सेवाच चालविणा-यास नकार देणा-या महामंडळाच्या कारभाराची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.महामंडळाने शहर बस वाहतूक बंद करण्यासाठी लॉक डाऊन हे निमित्त शोधले असले तरी यापूर्वी ही सेवा बंद करण्यासाठी किंवा नागरीकांनी तक्रारी ही सेवा महापालिकेस सुरू करण्यास भाग पाडावे यासाठी अनेक भागातील बस फे-याच बंद केल्या. शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून येणा-या नागरीकांचे त्यामुळे हाल झाले. विद्यार्थ्यांना कॉलेजला जाणे अडचणीचे ठरले. पासचे पैसे भरूनवाया गेले. शहरातल्या उपनगरात अनेक भागात फ्रिक्वेंसी कमी केली. त्यामुळे नागरीकांचे हाल झाले. प्रवाशांची सोय नव्हे तर जाणिवपूर्वक हाल करणा-या महामंडळाची सेवा तरी नक्की कोणासाठी चालते असाही प्रश्न आता प्रवासी करीत आहेत.

 

 

टॅग्स :Bus Driverबसचालकcorona virusकोरोना वायरस बातम्या