शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ज्यांच्या भरवशावर एसटी त्यांनाच दिला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:21 IST

नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ नफ्यात आहेच कोठे मग असे असताना प्रवाशांचे हित आणि सामाजिक बांधीलकी धाब्यावर बसवून व्यवसायिक वृत्तीने महामंडळाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतोट्याचे कारण: वर्षानुवर्ष कमवलेल्या नफ्याचे काय?

नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ नफ्यात आहेच कोठे मग असे असताना प्रवाशांचे हित आणि सामाजिक बांधीलकी धाब्यावर बसवून व्यवसायिक वृत्तीने महामंडळाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य परिवहन महामंडळाची मक्तेदारी सुरूवातीला ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात होती. १९९२ च्या अगोदर ही मक्तेदारी असताना महामंडळाला नफ्या तोट्याचे गणित कधी आठवले नाही आणि त्यानंतर मात्र शहरातील बसवाहतूक ही आपली जबाबदारी नाहीच, असे सांगून हात झटकण्यास महामंडळाने सुरूवात केली. त्यानंतर नाशिकसह अन्य महापालिकांना वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात येऊन ही जबाबदारी आमची नाहीच असे ठसविण्याची नाहीच असे इशारे देण्यास सुरूवात झाली. महामंडळाची सूत्रे उत्तमराव खोब्रागडे यांच्याकडे असताना तर थेट वृत्तपत्रात नोटिसा देऊन आता बस सेवा चालविणार नसल्याचे निर्वाणीचे इशारे देण्यात आले. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना रोखल्याने नाशिक शहरात तरी त्यांच्या इशाºयांचा काही परिणाम झाला नाही आता महापालिका राजकिय दबावामुळे ही सेवा चालविण्यास तयार झाली असताना त्याच्या सेवेची प्रतिक्षा न करताही बस सेवाच सुरू करायची नाही, इतकीमुजोरी महामंडळ का करीत आहे, असा प्रश्न आहे.नाशिक शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली हे प्रवाशी घटण्याचे कारण सांगितले जात असले तरी शहरबा' सेवेत देखील खासगी सेवेचे आव्हान नाही काय, मग तेथे सेवा बंद करणे शक्य आहे काय, असाही प्रश्न केला जात आहे.मुळातच ही प्रवाशासाठी बस सेवा चालवणे ही एकमेव जबाबदारी महामंडळाकडे आहे. महापालिकांकडे रस्ते,पाणी, गटारी ही सर्व मुलभूत सेवांची कामे आहे. ती करता करता त्यांना नाकीनव येतात अशास्थितीत ते बस सेवा चालविण्यास तयार असताना त्याची वाट न बघता शहरात बस सेवाच चालविणा-यास नकार देणा-या महामंडळाच्या कारभाराची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.महामंडळाने शहर बस वाहतूक बंद करण्यासाठी लॉक डाऊन हे निमित्त शोधले असले तरी यापूर्वी ही सेवा बंद करण्यासाठी किंवा नागरीकांनी तक्रारी ही सेवा महापालिकेस सुरू करण्यास भाग पाडावे यासाठी अनेक भागातील बस फे-याच बंद केल्या. शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून येणा-या नागरीकांचे त्यामुळे हाल झाले. विद्यार्थ्यांना कॉलेजला जाणे अडचणीचे ठरले. पासचे पैसे भरूनवाया गेले. शहरातल्या उपनगरात अनेक भागात फ्रिक्वेंसी कमी केली. त्यामुळे नागरीकांचे हाल झाले. प्रवाशांची सोय नव्हे तर जाणिवपूर्वक हाल करणा-या महामंडळाची सेवा तरी नक्की कोणासाठी चालते असाही प्रश्न आता प्रवासी करीत आहेत.

 

 

टॅग्स :Bus Driverबसचालकcorona virusकोरोना वायरस बातम्या