शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पाणीचोरी रोखली, तरच विसर्ग शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:22 IST

चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.चेहेडी आणि लष्करी हद्दीतील बंधाºयातून ज्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो तेथे आता पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळ संस्थेने दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे पाणीचोरीच्या प्रकारामुळे बंधाºयातील पाणीसाठी कमी होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागासोबत पाणीवापर संस्थेचे सहकार्याने भरारी पथक नेमले आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग पी. एम. कुलकर्णी, आर. जी. सोनवणे, शेख वाणी, नाशिक मनपाचे डी. एल. खेलूकर, ए. टी. यंदे, भगूर पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रवींद्र संसारे, सिन्नर पालिका मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे डी. जे. सोनजे, महेंद्र कराटे, फकीर उगले, पूर्वा माळी आदींनी चेहेडी ते साउथ देवळाली नदीच्या काठावर सर्व गाव परिसरात पाहणी करून अनेक मोटारी जप्त करून पंप काढण्यात आले. जोपर्यंत पाणी दुष्काळी परिस्थिती आहे तोपर्यंत दिवस-रात्री भरारी पथक कारवाई करत राहणार असल्याने शेतकºयांनी पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे.दोन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लकजिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ कारवाई करीत अनधिकृत वापर करणाºया शेतकºयांना दणका दिला आहे. त्यांचे कृषिपंप तसेच स्टार्टरदेखील तोडून टाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दारणा नदी कोरडी आहे, तर नाशिकरोेड, चेहेडी व देवळाली लष्करी बंधाºयात दोन दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असल्यामुळे नाशिक महापालिका, भगूर-सिन्नर नगरपालिका औद्योगिक विकास मंडळासह विविध गावांतील संस्थांनी दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी करताच जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन अनधिकृत वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

टॅग्स :riverनदीWaterपाणी