शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पाणीचोरी रोखली, तरच विसर्ग शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:22 IST

चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.चेहेडी आणि लष्करी हद्दीतील बंधाºयातून ज्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो तेथे आता पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळ संस्थेने दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे पाणीचोरीच्या प्रकारामुळे बंधाºयातील पाणीसाठी कमी होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागासोबत पाणीवापर संस्थेचे सहकार्याने भरारी पथक नेमले आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग पी. एम. कुलकर्णी, आर. जी. सोनवणे, शेख वाणी, नाशिक मनपाचे डी. एल. खेलूकर, ए. टी. यंदे, भगूर पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रवींद्र संसारे, सिन्नर पालिका मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे डी. जे. सोनजे, महेंद्र कराटे, फकीर उगले, पूर्वा माळी आदींनी चेहेडी ते साउथ देवळाली नदीच्या काठावर सर्व गाव परिसरात पाहणी करून अनेक मोटारी जप्त करून पंप काढण्यात आले. जोपर्यंत पाणी दुष्काळी परिस्थिती आहे तोपर्यंत दिवस-रात्री भरारी पथक कारवाई करत राहणार असल्याने शेतकºयांनी पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे.दोन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लकजिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ कारवाई करीत अनधिकृत वापर करणाºया शेतकºयांना दणका दिला आहे. त्यांचे कृषिपंप तसेच स्टार्टरदेखील तोडून टाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दारणा नदी कोरडी आहे, तर नाशिकरोेड, चेहेडी व देवळाली लष्करी बंधाºयात दोन दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असल्यामुळे नाशिक महापालिका, भगूर-सिन्नर नगरपालिका औद्योगिक विकास मंडळासह विविध गावांतील संस्थांनी दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी करताच जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन अनधिकृत वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

टॅग्स :riverनदीWaterपाणी