शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पाणीचोरी रोखली, तरच विसर्ग शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:22 IST

चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधारा-यातील अनधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय दारणा धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, भरारी पथकाने ३० अनधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.चेहेडी आणि लष्करी हद्दीतील बंधाºयातून ज्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो तेथे आता पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळ संस्थेने दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे पाणीचोरीच्या प्रकारामुळे बंधाºयातील पाणीसाठी कमी होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागासोबत पाणीवापर संस्थेचे सहकार्याने भरारी पथक नेमले आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग पी. एम. कुलकर्णी, आर. जी. सोनवणे, शेख वाणी, नाशिक मनपाचे डी. एल. खेलूकर, ए. टी. यंदे, भगूर पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रवींद्र संसारे, सिन्नर पालिका मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे डी. जे. सोनजे, महेंद्र कराटे, फकीर उगले, पूर्वा माळी आदींनी चेहेडी ते साउथ देवळाली नदीच्या काठावर सर्व गाव परिसरात पाहणी करून अनेक मोटारी जप्त करून पंप काढण्यात आले. जोपर्यंत पाणी दुष्काळी परिस्थिती आहे तोपर्यंत दिवस-रात्री भरारी पथक कारवाई करत राहणार असल्याने शेतकºयांनी पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे.दोन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लकजिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ कारवाई करीत अनधिकृत वापर करणाºया शेतकºयांना दणका दिला आहे. त्यांचे कृषिपंप तसेच स्टार्टरदेखील तोडून टाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दारणा नदी कोरडी आहे, तर नाशिकरोेड, चेहेडी व देवळाली लष्करी बंधाºयात दोन दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असल्यामुळे नाशिक महापालिका, भगूर-सिन्नर नगरपालिका औद्योगिक विकास मंडळासह विविध गावांतील संस्थांनी दारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी करताच जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन अनधिकृत वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

टॅग्स :riverनदीWaterपाणी