शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

सजग व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:16 AM

वाचकांना जागरूक बनविण्याचे, जागल्याचे कार्य वाचनालयांच्या माध्यमातून होत असते. अशा सजग झालेल्या व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात. अशा स्वरूपाच्या वाचनालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.

ठळक मुद्देरावसाहेब कसबे : सावित्रीबाई फुले राष्टÑीय पुरस्कार सुभाष वारे यांना प्रदान

नाशिक : वाचकांना जागरूक बनविण्याचे, जागल्याचे कार्य वाचनालयांच्या माध्यमातून होत असते. अशा सजग झालेल्या व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात. अशा स्वरूपाच्या वाचनालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.यावेळी कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयातर्फे शुक्र वारी सार्वजनिक वाचनालयात क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार तसेच स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन प्रा. सुभाष वारे यांना गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी कसबे बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे होते. सद्यस्थितीवर भाष्य करताना कसबे म्हणाले, की देशासमोर मोठी आव्हाने आहेत. यापूर्वीदेखील लढाया झाल्या, रक्तपात झाले, अन्याय झाले, पण माणूस मेला नाही. सध्याची परिस्थिती जनता निवळू शकते. यावेळी उत्तम कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. सुभाष वारे यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. सत्तेचा अमरपट्टा जनतेने कुणालाही दिलेला नाही. त्यामुळे संकटात लढत राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, राजू नाईक, राजू देसले, डॉ. हेमलता पाटील, डॉ. मनीषा जगताप, दत्तूू तुपे, रविकांत शार्दुल आदी उपस्थित होते. सुवर्णा देसले यांनी मानपत्राचे वाचन केले.प्रेरणा पुरस्कारार्थीक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार नाशिकचे महादेव खुडे, श्रीकांत पाटील, माया खोडवे, चांदवडच्या सरुबाई भंडारे आणि मुंबईचे संदीप पवार यांना प्रदान करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक