शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

‘आॅनलाइन’चा पर्यायही तितकाच महागडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:06 IST

नाशिक : कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी शाळा सुरू करताना काळजी घेतानाच ज्या मुलांना येणे शक्य नाही त्यांच्यासाठी आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय शिक्षण विभागाने सुचविला असला तरी शिक्षण विभाग यासंदर्भात चाचपडत आहे. त्यातही इंग्रजी माध्यमाच्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न शाळा आणि पालकांसाठी ठीक, परंतु सर्वच ठिकाणी यासंदर्भातील पर्याय उपयुक्त ठरण्याविषयी साशंकता आहे.

नाशिक : कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी शाळा सुरू करताना काळजी घेतानाच ज्या मुलांना येणे शक्य नाही त्यांच्यासाठी आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय शिक्षण विभागाने सुचविला असला तरी शिक्षण विभाग यासंदर्भात चाचपडत आहे. त्यातही इंग्रजी माध्यमाच्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न शाळा आणि पालकांसाठी ठीक, परंतु सर्वच ठिकाणी यासंदर्भातील पर्याय उपयुक्त ठरण्याविषयी साशंकता आहे. विशेषत: मराठी अनुदानित आणि शहर तसेच जिल्ह्यातील शाळेत येणारा वर्ग बघता हे माध्यम सर्व दूर पोहोचण्याविषयी शंका आहे. त्यामुळे याबाबतदेखील व्यवहार्य अभ्यास आवश्यक आहे.शिक्षणखात्याने दिलेल्या सूचनेनुसार आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी दूरदर्शनची स्वतंत्र शिक्षणवाहिनी सुरू करण्याचा मानस असला तरी हादेखील सोपा पर्याय नाही. मुळात आॅनलाइन अध्यापनाची पद्धत पारंपरिक पद्धत वेगळी आहे. सध्या लॉकडाउनमध्ये काही तास मोबाइलवर शिक्षण देणे वेगळे आणि प्रत्यक्षात नियमित शिक्षण देणे हा फरक आहे. त्यातच अगदी घरी शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक मुलाकडे स्वतंत्र स्मार्टफोन आणि किमान फोरजी इंटरनेट असणे आवश्यक आहे. हा फोन मुलांसाठी वेगळा घ्यावा लागेल शिवाय दोन किंवा तीन मुले असतील तर पालकांना त्या संख्येने फोन घ्यावे लागतील. शहरातील काही शाळांनी तर पालकांना दिलेल्या सूचनेत लिंकमध्ये केवळ स्मार्ट फोनच नाही तर लॅपटॉप, त्यासाठी थ्रीजी फोरजीचे कनेक्शन त्याचा स्पीड किती असावा हे नमूद केले आहे. याशिवाय माइक, वेब कॅमदेखील आवश्यक आहे. मोबाइलपेक्षा लॅपटॉप मुलांसाठी सोपा असला तरी त्याचा खर्च किती पालक करू शकतील?महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तर वेगळीच समस्या आहे. याठिकाणी येणारा विद्यार्थीवर्गाची आर्थिक स्थिती बघता त्यांना केवळ शिक्षणासाठी मुलांना वेगळा स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट डाटा उपलब्धेबाबत चाचणी करण्याची गरज आहे. सध्या तर लॉक डाऊनमुळे मजुरी बंद आणि त्यामुळे साध्या मोबाइलचा रिचार्ज न करणारे पालकदेखील मनपाच्या शाळांमध्ये शिक्षकांना आढळले आहे. त्यामुळे आॅनलाइन शिक्षण संसर्ग टाळण्यासाठी सोपे असले तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीते सोपे नाही. (क्रमश:)--------------------शहरी भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन पर्याय सहज उपलब्ध असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या माध्यमातून काम करून शिक्षण घेता येणार आहे. यापुढील काळात डिजिटल युगात प्रवेश केल्याशिवाय पर्यायच नाही. सध्या जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाइनसाठी आवश्यक सुविधा पोहोचल्या आहे. मात्र उर्वरित ३० टक्के विद्यार्थ्यांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदारांनी पायाभूत सुविधांसह इंटरनेट जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.-नीलिमा पवार,सरचिटणीस, मविप्र, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक