शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे कांदा पुढच्या वर्षीही रडवणार

By श्याम बागुल | Updated: November 5, 2019 19:54 IST

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर्ग आनंदीत

ठळक मुद्देबियाण्यांची वानवा : रोपे वाहून गेल्याने खरीप लागवड रखडणारउन्हाळी कांद्याचे जवळपास एक लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र

श्याम बागुलनाशिक : रब्बीच्या लागवडीसाठी आॅक्टोबरमध्ये लावलेली रोपे वाहून गेली, तर डिसेंबरमध्ये लागवड करावयाच्या खरिपाच्या कांद्यासाठी बाजारात बियाणे मिळत नसल्याने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कांद्याची पुढच्या वर्षी तीव्र टंचाई निर्माण होऊन संपूर्ण वर्षभर कांदा ग्राहकांना रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजारात बियाण्यांची वानवा पाहता, त्याचेही दर गगणाला भिडल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करावयाची आहे, त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर्ग आनंदीत झालेला असताना त्यांच्या आनंदावर अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे. २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे खळ्यावर काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यामुळे खाण्यायोग्य राहिलेला नाही. मुळातच हा कांदा फारसा टिकत नाही, त्यातच पावसात भिजल्यामुळे त्याला बदललेल्या हवामानामुळे कोंब फुटू लागले आहेत. परिणामी कांद्याचे मार्केट तेजीत राहण्याची शक्यता आता दिसत नाही. असे असताना शेतकºयांनी रब्बीच्या लागवडीसाठी लावलेली रोपेदेखील अवकाळी पावसामुळे वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवरील रोपे वाहून गेली असून, त्यामुळे रब्बीसाठी शेतक-यांना आता नव्याने कांदा रोपांची लागवड करावी लागणार आहे. साधारणत: रोपे तयार होण्यास महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रब्बीच्या कांद्याची लागवड पूर्ण केली जाते. परंतु यंदा अवकाळी पावसामुळे रोपेच वाहून गेल्याने व जी काही रोपे अवकाळी पावसामुळे बचावली त्यांच्यावर अति पावसामुळे करपा रोगाची लागवड झपाट्याने होत आहे. त्यामुळे नवीन रोपे लागवड करण्यास लागणारा कालावधी पाहता, रब्बीची लागवड लांबणीवर पडण्याची किंवा कांदा लागवडच रद्द करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. एकीकडे रब्बीची लागवड करताना दुसरीकडे शेतकरी खरिपाच्या कांदा लागवडीची तयारी वर्षानुवर्षे करीत आला आहे. यंदा शेतक-याचा नित्यक्रम बदलणार आहे. रब्बीच्या कांद्याच्या लागवडीची परवड झालेली असताना उन्हाळी कांद्याची डिसेंबरमध्ये लागवड करण्यासाठी बाजारात शेतक-यांना कांद्याचे बियाणे मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. डिसेंबरमध्ये लावलेला कांदा एप्रिल, मे महिन्यात बाजारात येतो. जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे जवळपास एक लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र आहे. रब्बीचे क्षेत्र फारसे नसले तरी, उन्हाळी कांदा बाजारात येईपावेतो रब्बीचा कांदा ग्राहकांची मागणी व उपलब्धता याचे संतुलन राखण्यास उपयोगी ठरत होता. आता मात्र उन्हाळी कांद्यासाठी बियाणे मिळत नसल्याने जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवर कांद्याचे पर्यायी काय उत्पादन घ्यावे, असा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे तीव्र टंचाईमुळे कांद्याचे दर वाढतील परिणामी ग्राहकांचे बजेट कोलमडून कांदा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकonionकांदा