शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे कांदा पुढच्या वर्षीही रडवणार

By श्याम बागुल | Updated: November 5, 2019 19:54 IST

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर्ग आनंदीत

ठळक मुद्देबियाण्यांची वानवा : रोपे वाहून गेल्याने खरीप लागवड रखडणारउन्हाळी कांद्याचे जवळपास एक लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र

श्याम बागुलनाशिक : रब्बीच्या लागवडीसाठी आॅक्टोबरमध्ये लावलेली रोपे वाहून गेली, तर डिसेंबरमध्ये लागवड करावयाच्या खरिपाच्या कांद्यासाठी बाजारात बियाणे मिळत नसल्याने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कांद्याची पुढच्या वर्षी तीव्र टंचाई निर्माण होऊन संपूर्ण वर्षभर कांदा ग्राहकांना रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजारात बियाण्यांची वानवा पाहता, त्याचेही दर गगणाला भिडल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करावयाची आहे, त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर्ग आनंदीत झालेला असताना त्यांच्या आनंदावर अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे. २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे खळ्यावर काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यामुळे खाण्यायोग्य राहिलेला नाही. मुळातच हा कांदा फारसा टिकत नाही, त्यातच पावसात भिजल्यामुळे त्याला बदललेल्या हवामानामुळे कोंब फुटू लागले आहेत. परिणामी कांद्याचे मार्केट तेजीत राहण्याची शक्यता आता दिसत नाही. असे असताना शेतकºयांनी रब्बीच्या लागवडीसाठी लावलेली रोपेदेखील अवकाळी पावसामुळे वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवरील रोपे वाहून गेली असून, त्यामुळे रब्बीसाठी शेतक-यांना आता नव्याने कांदा रोपांची लागवड करावी लागणार आहे. साधारणत: रोपे तयार होण्यास महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रब्बीच्या कांद्याची लागवड पूर्ण केली जाते. परंतु यंदा अवकाळी पावसामुळे रोपेच वाहून गेल्याने व जी काही रोपे अवकाळी पावसामुळे बचावली त्यांच्यावर अति पावसामुळे करपा रोगाची लागवड झपाट्याने होत आहे. त्यामुळे नवीन रोपे लागवड करण्यास लागणारा कालावधी पाहता, रब्बीची लागवड लांबणीवर पडण्याची किंवा कांदा लागवडच रद्द करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. एकीकडे रब्बीची लागवड करताना दुसरीकडे शेतकरी खरिपाच्या कांदा लागवडीची तयारी वर्षानुवर्षे करीत आला आहे. यंदा शेतक-याचा नित्यक्रम बदलणार आहे. रब्बीच्या कांद्याच्या लागवडीची परवड झालेली असताना उन्हाळी कांद्याची डिसेंबरमध्ये लागवड करण्यासाठी बाजारात शेतक-यांना कांद्याचे बियाणे मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. डिसेंबरमध्ये लावलेला कांदा एप्रिल, मे महिन्यात बाजारात येतो. जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे जवळपास एक लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र आहे. रब्बीचे क्षेत्र फारसे नसले तरी, उन्हाळी कांदा बाजारात येईपावेतो रब्बीचा कांदा ग्राहकांची मागणी व उपलब्धता याचे संतुलन राखण्यास उपयोगी ठरत होता. आता मात्र उन्हाळी कांद्यासाठी बियाणे मिळत नसल्याने जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवर कांद्याचे पर्यायी काय उत्पादन घ्यावे, असा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे तीव्र टंचाईमुळे कांद्याचे दर वाढतील परिणामी ग्राहकांचे बजेट कोलमडून कांदा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकonionकांदा