शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

अवकाळी पावसामुळे कांदा पुढच्या वर्षीही रडवणार

By श्याम बागुल | Updated: November 5, 2019 19:54 IST

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर्ग आनंदीत

ठळक मुद्देबियाण्यांची वानवा : रोपे वाहून गेल्याने खरीप लागवड रखडणारउन्हाळी कांद्याचे जवळपास एक लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र

श्याम बागुलनाशिक : रब्बीच्या लागवडीसाठी आॅक्टोबरमध्ये लावलेली रोपे वाहून गेली, तर डिसेंबरमध्ये लागवड करावयाच्या खरिपाच्या कांद्यासाठी बाजारात बियाणे मिळत नसल्याने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कांद्याची पुढच्या वर्षी तीव्र टंचाई निर्माण होऊन संपूर्ण वर्षभर कांदा ग्राहकांना रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजारात बियाण्यांची वानवा पाहता, त्याचेही दर गगणाला भिडल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करावयाची आहे, त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर्ग आनंदीत झालेला असताना त्यांच्या आनंदावर अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे. २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे खळ्यावर काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यामुळे खाण्यायोग्य राहिलेला नाही. मुळातच हा कांदा फारसा टिकत नाही, त्यातच पावसात भिजल्यामुळे त्याला बदललेल्या हवामानामुळे कोंब फुटू लागले आहेत. परिणामी कांद्याचे मार्केट तेजीत राहण्याची शक्यता आता दिसत नाही. असे असताना शेतकºयांनी रब्बीच्या लागवडीसाठी लावलेली रोपेदेखील अवकाळी पावसामुळे वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवरील रोपे वाहून गेली असून, त्यामुळे रब्बीसाठी शेतक-यांना आता नव्याने कांदा रोपांची लागवड करावी लागणार आहे. साधारणत: रोपे तयार होण्यास महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रब्बीच्या कांद्याची लागवड पूर्ण केली जाते. परंतु यंदा अवकाळी पावसामुळे रोपेच वाहून गेल्याने व जी काही रोपे अवकाळी पावसामुळे बचावली त्यांच्यावर अति पावसामुळे करपा रोगाची लागवड झपाट्याने होत आहे. त्यामुळे नवीन रोपे लागवड करण्यास लागणारा कालावधी पाहता, रब्बीची लागवड लांबणीवर पडण्याची किंवा कांदा लागवडच रद्द करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. एकीकडे रब्बीची लागवड करताना दुसरीकडे शेतकरी खरिपाच्या कांदा लागवडीची तयारी वर्षानुवर्षे करीत आला आहे. यंदा शेतक-याचा नित्यक्रम बदलणार आहे. रब्बीच्या कांद्याच्या लागवडीची परवड झालेली असताना उन्हाळी कांद्याची डिसेंबरमध्ये लागवड करण्यासाठी बाजारात शेतक-यांना कांद्याचे बियाणे मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. डिसेंबरमध्ये लावलेला कांदा एप्रिल, मे महिन्यात बाजारात येतो. जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे जवळपास एक लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र आहे. रब्बीचे क्षेत्र फारसे नसले तरी, उन्हाळी कांदा बाजारात येईपावेतो रब्बीचा कांदा ग्राहकांची मागणी व उपलब्धता याचे संतुलन राखण्यास उपयोगी ठरत होता. आता मात्र उन्हाळी कांद्यासाठी बियाणे मिळत नसल्याने जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवर कांद्याचे पर्यायी काय उत्पादन घ्यावे, असा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे तीव्र टंचाईमुळे कांद्याचे दर वाढतील परिणामी ग्राहकांचे बजेट कोलमडून कांदा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकonionकांदा