शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

चाळीत साठविलेला कांदा सडू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 1:10 AM

आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. आॅगस्ट मध्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आला. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात चाळीत साठविलेला कांदा आता सडू लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माळवाडी : आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. आॅगस्ट मध्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आला. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात चाळीत साठविलेला कांदा आता सडू लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  चांगला भाव मिळेल, या उद्देशाने अनेक शेतकºयांनी मार्च महिन्यापासून कांदा चाळीत साठवला होता. कांदा चाळीत साठवलेला असल्याने खरिपासाठी कर्ज घेऊन शेतकºयांनी शेतीसाठी भांडवल उभे केले.कांदा भाववाढीची शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांदा भावात घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंतित आहेत. १५ आॅगस्टच्या आधी सरासरी ११६० रूपये प्रति क्विंटलने विकला जाणारा उन्हाळ कांदा आज सरासरी ७८० रूपये प्रति क्विंटल या भावाने विकला जात आहे. कांद्याला चार पैसे तर मिळालेच नाहीत नाही; पण आता चाळीतील कांदा पूर्णत: पोकळ होऊ लागला आहे. काही ठिकाणी सडू लागला आहे. कांदा भाव ८५० ते ९५० रूपयांपेक्षा जास्त नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवा कांदा अजून बाजारात दाखल न झाल्याने चाळीत कांदा ठेवावा की विकावा, चाळीत कांदा सडला तर काय करायचे, असे प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाले आहेत. कांदा भावात सरासरी ५०० ते ६०० रूपये घसरणीचा फटका बसत असला तरी चाळीतील कांदा सडणे व वजन घटू लागल्याने आता कांदा विक्रीला काढण्याशिवाय शेतकºयांपुढे पर्याय नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा