शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

कांदा गडगडला; शेतकºयांमध्ये नैराश्य आवक वाढली : तेराशेपर्यंत भाव खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:11 AM

महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत.

नाशिक : महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वाढलेली आवक हेच कारण भाव गडगडण्यामागे असले तरी, पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या कांद्याच्या ढासळत चाललेल्या गुणवत्तेचाही त्यावर परिणाम झाला आहे.सध्या प्रतिक्विंटल रुपये १२०० ते १५०० इतक्या खालपर्यंत कांद्याचे भाव आले आहेत. त्यामुळे शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून त्याची साठवणूक व्यापाºयांकडून करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिस्थितीवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कांदा पिकविणाºया राज्यांमध्ये यंदा अतिवृष्टीने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले, परिणामी देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत भाव गडगडल्यामुळे शेतकºयांनी कांदा चाळीतच साठवून ठेवला. शेतकºयांनी त्यावेळी घेतलेला व्यवहारी निर्णय मात्र त्यांचा फायदा करून गेला. जुलै महिन्यात कांद्याची चणचण भासू लागल्यानंतर शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला परिणामी त्याला चांगला भाव मिळाला. कांद्याची प्रमाणात आवक झाल्यामुळे व्यापाºयांनीही त्याला भाव दिला. तथापि, कांद्याचा बाजार तेजीत आला म्हटल्यावर शेतकºयांनी बाजारात धाव घेतली व नेमक्या बाजारातील सूत्र बिघडल्याने कांदा गेल्या आठवड्यापासून जितक्या झपाट्याने वर गेला तितकाच खाली कोसळण्यास सुरुवात झाली. कांद्याच्या तेजीवर सणासुदीचा आनंद द्विगुणीत करण्याच्या तयारीत असलेले शेतकरी नैराश्येत सापडले.ग्राहकांना फायदा नाहीचबाजार समितीत कांदा गडगडून निम्म्यावर आला असला तरी, त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत नाही. आजही कांदा बाजारात ३० ते ३५ रुपये इतका भाव असून, दुसरीकडे कांदा पिकविणाºया शेतकºयाला मात्र या बाजारातील भाववाढीचा काहीच लाभ होत नाही.गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्याच्या वृत्तामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारभाव कमी करण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला व इजिप्तहून काही प्रमाणात कांद्याची आयातही झाली. त्यामुळे भविष्यात कांद्याला भाव मिळणार नाही अशा अनामिक भीतीपोटी जिल्ह्यातील शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला. प्रचंड आवक झाल्यामुळे कांद्याला १२०० ते १७०० इतकाच भाव मिळाला, त्यातही कांद्याचा दर्जा पाहून व्यापाºयांनी भाव ठरविण्यास सुरुवात केली आहे.