शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

चाळीतून कांदा थेट उकीरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:52 IST

भाव कवडीमोल : वाहतूक खर्चही परवडत नसल्याने शेतकरी हवालदिल

ठळक मुद्देपोळ कांद्याची आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे त्याचे देखील बाजार भाव कोसळले आहेत

देवळा : उन्हाळी कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतांनाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकीरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.देवळा तालुक्यातील अनेक शेतक-यांनी चाळीतील कांदा उकीरड्यावर टाकून दिला आहे. पोळ कांद्याची आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे त्याचे देखील बाजार भाव कोसळले आहेत, यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांच्या मागे लागलेली साडेसाती संपायचे नाव घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीतील उन्हाळी कांद्याचे जागेवर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व पोळ कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत गतवर्षी उन्हाळी कांद्याचे विक्र मी उत्पादन निघाल्यानंतर चांगला भाव मिळेल या मोठ्या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतक-यांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. शासनाने नवीन कांदा चाळी बांधण्यासाठी दिलेले प्रोत्साहन, त्यासाठी दिलेले अनुदान याचा सकारात्मक परिणाम होऊन बहुसंख्य शेतक-यांनी हयाचा लाभ घेत नवीन चाळी तयार केल्या. यामुळे थोडेफार अपवाद सोडले तर प्रत्येक शेतक-याकडे स्वत:ची कांदा चाळ तयार झाली. यामुळे सर्व शेतक-यांनी कांदा चाळीत साठवणुक करण्यावर भर दिला.परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यातच सोशल मिडियावर कांद्याच्या बाजार भावासंदर्भात दररोज येणा-या वेगवेगळ्या पोस्टमुळे शेतक-यांच्या अपेक्षा वाढून तर संभ्रम अधिकच वाढला. अनेक शेतक-यांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता आला नाही. ज्या शेतक-यांकडे कांदा साठवणुक करण्याची सोय नव्हती त्यांचाच कांदा बाजारात विक्रि साठी येत होता. यामुळे त्याकाळात बाजारात कांद्याची आवक देखील कमी झाली. परंतु बाजार काही वधारले नाहीत. मिळेल त्या भावात कांदा विकण्याची वेळ शेतक-यांवर आली. त्यातच नवीन पोळ कांद्याचे बाजारात झालेल्या दमदार आगमनाचा उन्हाळी कांद्याला फटका बसला.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा