शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदी उठविल्याने कांदा भावात तेजीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:05 IST

लासलगाव : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर केंद्र सरकारने १ जानेवारी २०२१ पासून कांदा निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केल्याने बाजारपेठेत कांदा भावात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे; तर उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याने ही बंदी उठविण्याचा लाल व रांगडा कांद्यासाठी तत्काळ लाभ होणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देसंमिश्र प्रतिक्रिया : परवानग्यांसाठी लागणार महिन्याचा कालावधी

लासलगाव : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर केंद्र सरकारने १ जानेवारी २०२१ पासून कांदा निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केल्याने बाजारपेठेत कांदा भावात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे; तर उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याने ही बंदी उठविण्याचा लाल व रांगडा कांद्यासाठी तत्काळ लाभ होणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने तब्बल २१ वर्षानंतर १४ सप्टेंबर २०२० रोजी कांदा निर्यात बंदी जाहीर केली होती. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. कांदा भाव कोसळून उत्पादकांना करोडो रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते.

       कांदा निर्यात बंदी उठवावी, यासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून या मागणीने जोर धरला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता, केंद्र सरकारने साडेतीन महिन्यांनंतर कांदा निर्यात बंदी उठविली आहे. या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

         केंद्र सरकारने प्रत्यक्षात कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी कांदा निर्यातीकरिता लागणाऱ्या सर्व परवानगी तसेच इतर पूर्तता होण्यासाठी सुमारे पंधरा ते तीस दिवसांचा कालावधी जाणार आहे, तसेच व्यापारी वर्गाचे नव्याने होणारे सौदे पाहता प्रत्यक्षात या निर्णयाने बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कोट....कांदा निर्यात बंदी उठवावी, याकरिता लासलगाव बाजार समिती अग्रेसर होती. या निर्णयाने आता बाजार समितीच्या व्यवहारात तेजी निर्माण होईल. कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर जे नुकसान कांदा भाव कमी झाल्याने सहन करावे लागले ते आता भरून निघण्यास मदत होणार आहे.- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समितीशेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या कांदा पिकावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. निर्यातबंदी खुली करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी असल्याचे दिसून येते.- डॉ. भारती पवार, खासदार.कांदा निर्यातबंदी उठविणे हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सध्या लाल कांदा सुरू आहे. त्यानंतर रांगडा कांदा येणार आहे. खरी निर्यात उन्हाळ कांद्याची होत असते; परंतु केवळ कांदा उत्पादकांच्या रोषाचे प्रमाण कमी होण्याकरिता केंद्र सरकारने केलेली ही निव्वळ धुळफेक आहे. कारण साडेतीन महिन्यात तुटलेले सौदे परत होण्यासाठी आता व्यापारी गतिमान होतील. परवानगी प्रक्रिया होण्याचा काळ पाहता याचा परिणाम चांगले भाव वाढण्यासाठी कितपत होईल, याबद्दल साशंकता वाटते.- जयदत्त होळकर, संचालक, मुंबई बाजार समिती .कांद्याची निर्यात बंदी केल्याने महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले होते; परंतु आता केंद्र सरकारने नववर्षाच्या शुभारंभालाच कांद्याची निर्यात बंदी उठविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो.कांदा उत्पादकांना या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार असून, यापुढील काळात केंद्र सरकारने कांद्याच्या आयात - निर्यातीचे ठोस धोरण ठरवावे आणि केंद्र सरकारने कांद्याकडे केवळ समस्या म्हणून न बघता परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणून बघावे.- भारत दिघोळे, प्रदेशाध्यक्ष, कांदा उत्पादक संघटनाकांदा निर्यात बंदीचे धरसोड धोरण आता कायमचे बंद करून ठोस निर्णय घेतला पाहिजे. कांदा साठवणुकीवरचेही निर्बंध हटवले पाहिजे. कांदा प्रश्नी सकारात्मक चर्चा होऊन धोरण झाले तरच परदेशी बाजारपेठेत भारतीय कांदा अव्वल राहील. त्यातून परकीय चलनाचे नुकसान टाळता येऊ शकते.- नितिन कुमार जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी