शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदी उठविल्याने कांदा भावात तेजीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:05 IST

लासलगाव : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर केंद्र सरकारने १ जानेवारी २०२१ पासून कांदा निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केल्याने बाजारपेठेत कांदा भावात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे; तर उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याने ही बंदी उठविण्याचा लाल व रांगडा कांद्यासाठी तत्काळ लाभ होणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देसंमिश्र प्रतिक्रिया : परवानग्यांसाठी लागणार महिन्याचा कालावधी

लासलगाव : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर केंद्र सरकारने १ जानेवारी २०२१ पासून कांदा निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केल्याने बाजारपेठेत कांदा भावात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे; तर उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याने ही बंदी उठविण्याचा लाल व रांगडा कांद्यासाठी तत्काळ लाभ होणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने तब्बल २१ वर्षानंतर १४ सप्टेंबर २०२० रोजी कांदा निर्यात बंदी जाहीर केली होती. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. कांदा भाव कोसळून उत्पादकांना करोडो रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते.

       कांदा निर्यात बंदी उठवावी, यासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून या मागणीने जोर धरला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता, केंद्र सरकारने साडेतीन महिन्यांनंतर कांदा निर्यात बंदी उठविली आहे. या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

         केंद्र सरकारने प्रत्यक्षात कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी कांदा निर्यातीकरिता लागणाऱ्या सर्व परवानगी तसेच इतर पूर्तता होण्यासाठी सुमारे पंधरा ते तीस दिवसांचा कालावधी जाणार आहे, तसेच व्यापारी वर्गाचे नव्याने होणारे सौदे पाहता प्रत्यक्षात या निर्णयाने बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कोट....कांदा निर्यात बंदी उठवावी, याकरिता लासलगाव बाजार समिती अग्रेसर होती. या निर्णयाने आता बाजार समितीच्या व्यवहारात तेजी निर्माण होईल. कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर जे नुकसान कांदा भाव कमी झाल्याने सहन करावे लागले ते आता भरून निघण्यास मदत होणार आहे.- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समितीशेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या कांदा पिकावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. निर्यातबंदी खुली करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी असल्याचे दिसून येते.- डॉ. भारती पवार, खासदार.कांदा निर्यातबंदी उठविणे हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सध्या लाल कांदा सुरू आहे. त्यानंतर रांगडा कांदा येणार आहे. खरी निर्यात उन्हाळ कांद्याची होत असते; परंतु केवळ कांदा उत्पादकांच्या रोषाचे प्रमाण कमी होण्याकरिता केंद्र सरकारने केलेली ही निव्वळ धुळफेक आहे. कारण साडेतीन महिन्यात तुटलेले सौदे परत होण्यासाठी आता व्यापारी गतिमान होतील. परवानगी प्रक्रिया होण्याचा काळ पाहता याचा परिणाम चांगले भाव वाढण्यासाठी कितपत होईल, याबद्दल साशंकता वाटते.- जयदत्त होळकर, संचालक, मुंबई बाजार समिती .कांद्याची निर्यात बंदी केल्याने महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले होते; परंतु आता केंद्र सरकारने नववर्षाच्या शुभारंभालाच कांद्याची निर्यात बंदी उठविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो.कांदा उत्पादकांना या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार असून, यापुढील काळात केंद्र सरकारने कांद्याच्या आयात - निर्यातीचे ठोस धोरण ठरवावे आणि केंद्र सरकारने कांद्याकडे केवळ समस्या म्हणून न बघता परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणून बघावे.- भारत दिघोळे, प्रदेशाध्यक्ष, कांदा उत्पादक संघटनाकांदा निर्यात बंदीचे धरसोड धोरण आता कायमचे बंद करून ठोस निर्णय घेतला पाहिजे. कांदा साठवणुकीवरचेही निर्बंध हटवले पाहिजे. कांदा प्रश्नी सकारात्मक चर्चा होऊन धोरण झाले तरच परदेशी बाजारपेठेत भारतीय कांदा अव्वल राहील. त्यातून परकीय चलनाचे नुकसान टाळता येऊ शकते.- नितिन कुमार जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी