शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

धुक्यामुळे कांदा उत्पादक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 1:07 AM

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून फवारणी : मर रोगाचा प्रादुर्भाव

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतात असलेले कांदा पीक पूर्णत: सडून गेल्याने तसेच मागील वर्षाचा कांदाही संपल्यामुळे कांद्यास सध्या पाच ते सहा हजार रु पयांचा बाजारभाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे व दवबिंदूमुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.येवला तालुक्यात नगदी पिक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारणता पोळ्यापासून या भागात कांदा लागवडीस प्रारंभ केला जातो.हा लागवड केलेला कांदा आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने पूर्णपणे सडून गेला आहे. कांदा लागवडीसाठी शेतकºयांनी एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च केला, पण परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकºयांना लाखो रु पयांचा फटका बसला आहे. उंच व मुरमाड जमिनीत असलेला थोडाफार कांदा वाचला. तसेच सध्या कांद्यास मिळत असलेल्या बाजारभावामुळे व पुढील काही दिवस असाच भाव मिळणार असल्याचा कयास बांधला जात असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.शेतकरी मिळेल तेथून कांदा रोपे आणून लागवड करताना दिसत आहे. मात्र सध्या पडत असलेल्या धुके व दवबिंदूमुळे कांदा पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. कांदापात पिवळी पडत असल्याने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकºयांचा खर्च वाढू लागला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती