शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातमूल्य हटविल्याने कांदा वधारला, मिळाला 2001 रुपये भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 18:09 IST

गेल्या आठवड्यापासून कांदा भावात मोठी घसरण होत असताना कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्याने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतिच्या कांद्याला 2001 रुपये भाव मिळाला

विंचूर (नाशिक) :  गेल्या आठवड्यापासून कांदा भावात मोठी घसरण होत असताना कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्याने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतिच्या कांद्याला 2001 रुपये भाव मिळाला. आठवडाभरापासून कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणार्या कांद्याने शुक्रवारच्या निर्यातमूल्य शुन्यावर आणण्याच्या महत्वपुर्ण निर्णयामुळे वेगाने कोसळत असलेल्या कांद्याच्या बाजार भावात वाढ झाली असून शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

कांद्याला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांना कधी नव्हे तो आर्थिक फायदा होत असल्याने शेतकर्यांमधुन आनंदाचे वातावरण असतानाच विंचूर उपबाजार आवारात 3700 चा उच्चांक गाठलेल्या कांद्याचे दर गत आठवड्यापासून झपाट्याने खाली येत होते. कांदा निम्या दरावर आल्याने या काळात देशांतर्गत बाजारात मोठी घसरण पहावयास मिळाली. त्यामुळे निर्यातमूल्य हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र काल कांदा निर्यातमूल्य तडकाफडकी पूर्णत हटविण्याचा निर्णय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केल्याने शनिवारी येथील उपबाजार आवारात आवक वाढुन कांदा दरात 600 रुपयांनी भाव वाढले. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे निर्यात खुली झाल्याने कांद्याचे दर स्थिर अथवा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी बाजारात कांदा विक्रीसाठी आणला होता. अपेक्षेप्रमाणे भाव वाढ झाल्याने शेतक्यांनी समाधान व्यक्त केले असून, आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून का होईना निर्यातमूल्य शुन्यावर आणल्य़ाने शेतकर्यांना दिलासा मिळाला असून, समाधान व्यक्त केले जात आहे.

स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात कांद्यावरील निर्यातमुल्य दर 850 डाँलर प्रतिटन केले होते. या लादलेल्या अघोषित निर्यातबंदिमुळे मोठा फटका बसला होता. कांदा भावात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक चिंताग्रस्त झाला. मात्र कांद्यावरील निर्यातमूल्य पुर्ण रद्द झाल्याने कमी झालेल्या कांदा निर्यातीला चालणा मिळणार आहे. निर्यातमूल्य शुन्यावर आल्याने चीन, पाकिस्तान,श्रीलंका यां देशांबरोबर स्पर्धा करता येणार असून बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.

शनिवारी विंचूर उपबाजार आवारात दोन सत्रात लिलाव झाले. कालच्या निर्णयामुळे भाव स्थिर राहतील किंवा वाढतील या आशेने शेतक्यांनी कांदा बाजारात आणला होता. उपबाजार आवारात 300 नगांची आवक होऊन बाजारभाव किमान1000, कमाल 2001 तर सरासरी 1750प्रतिक्विंटल राहिले. रविवारी बाजार समित्या बंद असल्याने सोमवार नंतर बाजारभाव अजुन वाढतील अशी अपेक्षा शेतकर्यांनी बोलुन दाखविली.

 निर्यातमूल्य हटविल्याने कांदयाला चांगले बाजारभाव मिळू शकेल. निर्यातीला चालना मिळणार असून, इतर देशांबरोबर स्पर्धा करता येणार असल्याने शेतकरी आर्थिकदष्ट्या सक्षम होऊ शकेल. - पंढरीनाथ थोरे, संचालक, लासलगाव बाजार समिती

काल सायंकाळी निर्यातमूल्य शुन्य केल्याचे समजल्याने भाव वाढतील अशी आशा होती. अपेक्षेप्रमाणे भाव वाढल्याने केंद्र शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- नवनाथ कवडे, शेतकरी, चांदवड