शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कांदा निर्यातबंदीचा सत्ताधाऱ्यांना फटका ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कांद्याचे खुल्या बाजारात दर वाढल्याने केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध ...

ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : व्यापाऱ्यांचीही नाराजी, समाज माध्यमातून रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कांद्याचे खुल्या बाजारात दर वाढल्याने केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध आणून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी, सरकारच्या या निर्णयाने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकºयांकडून सोशल माध्यमावर व्यक्त केलेल्या भावना पाहता, त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याकांदा निर्यातब्शेतकरी आक्रमक : व्यापाºयांचीही नाराजी, समाज माध्यमातून रोषांदीचा सत्ताधाºयांना फटका ?ची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुका लक्षात घेता खुद्द सत्ताधारी पक्षाच्या खासदार, आमदारांनीदेखील सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.नाशिक कांदा पिकविणारा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जात असून, देशपातळीवर कांद्याची वाढलेली मागणी व त्यामानाने होणाºया अपुºया पुरवठ्यामुळे गेल्या महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकºयांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे. खुल्या बाजारात कांद्याने ५० ते ७० रुपये किलोपर्यंत उसळी मारल्यामुळे ग्राहकांकडून ओरड होऊ लागताच, महाराष्टÑ व हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी जाहीर करून कांद्याचे भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच व्यापाºयांनाही कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लादून कृत्रिम टंचाई निर्माण करून कांद्याची संभाव्य दरवाढ टाळली. सरकारने सदरचा निर्णय कांदा उत्पादक शेतकºयांपेक्षा कांदा खाणाºया ग्राहक हिताचा विचार करून घेतल्याचे मानले जात असले तरी, ग्राहकांना खूश करण्याच्या नादात कांदा पिकविणाºया शेतकºयांचा सरकारने रोष ओढवून घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकºयांनी ठिकठिकाणी लिलाव बंद पाडून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला आहे.सरकारच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकºयांचे नुकसान होणार असून, त्यामुळे रोष निर्माण झाला आहे. रस्त्यावर उतरून शेतकरी आंदोलन करीत असताना दुसरीकडे त्यांनी सोशल माध्यमातूनही सरकारच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे. एकीकडे सरकारच्या विरोधात शेतकरी भावना व्यक्त करीत असताना दुसरीकडे सरकारच्या निर्णयाने शेतकºयांनी घाबरून न जाता आपला कांदा किमान आठवडाभर बाजारात आणू नये, असे आवाहनही केले जात आहे. उमेदवारांनाही भरली धडकीदोन दिवसांपासून सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध पाहता त्याचा निवडणुकीत फटका बसण्याची भीती सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांमध्ये व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने थेट केंद्र सरकारला पत्र लिहून सदरचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे तर सरकारच्या या निर्णयाने निवडणुकीला सामोरे जाऊ पाहणाºया उमेदवारांनाही धडकी भरली आहे.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019onionकांदा