शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कांदा निर्यातबंदीचा सत्ताधाऱ्यांना फटका ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कांद्याचे खुल्या बाजारात दर वाढल्याने केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध ...

ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : व्यापाऱ्यांचीही नाराजी, समाज माध्यमातून रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कांद्याचे खुल्या बाजारात दर वाढल्याने केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध आणून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी, सरकारच्या या निर्णयाने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकºयांकडून सोशल माध्यमावर व्यक्त केलेल्या भावना पाहता, त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याकांदा निर्यातब्शेतकरी आक्रमक : व्यापाºयांचीही नाराजी, समाज माध्यमातून रोषांदीचा सत्ताधाºयांना फटका ?ची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुका लक्षात घेता खुद्द सत्ताधारी पक्षाच्या खासदार, आमदारांनीदेखील सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.नाशिक कांदा पिकविणारा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जात असून, देशपातळीवर कांद्याची वाढलेली मागणी व त्यामानाने होणाºया अपुºया पुरवठ्यामुळे गेल्या महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकºयांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे. खुल्या बाजारात कांद्याने ५० ते ७० रुपये किलोपर्यंत उसळी मारल्यामुळे ग्राहकांकडून ओरड होऊ लागताच, महाराष्टÑ व हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी जाहीर करून कांद्याचे भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच व्यापाºयांनाही कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लादून कृत्रिम टंचाई निर्माण करून कांद्याची संभाव्य दरवाढ टाळली. सरकारने सदरचा निर्णय कांदा उत्पादक शेतकºयांपेक्षा कांदा खाणाºया ग्राहक हिताचा विचार करून घेतल्याचे मानले जात असले तरी, ग्राहकांना खूश करण्याच्या नादात कांदा पिकविणाºया शेतकºयांचा सरकारने रोष ओढवून घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकºयांनी ठिकठिकाणी लिलाव बंद पाडून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला आहे.सरकारच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकºयांचे नुकसान होणार असून, त्यामुळे रोष निर्माण झाला आहे. रस्त्यावर उतरून शेतकरी आंदोलन करीत असताना दुसरीकडे त्यांनी सोशल माध्यमातूनही सरकारच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे. एकीकडे सरकारच्या विरोधात शेतकरी भावना व्यक्त करीत असताना दुसरीकडे सरकारच्या निर्णयाने शेतकºयांनी घाबरून न जाता आपला कांदा किमान आठवडाभर बाजारात आणू नये, असे आवाहनही केले जात आहे. उमेदवारांनाही भरली धडकीदोन दिवसांपासून सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध पाहता त्याचा निवडणुकीत फटका बसण्याची भीती सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांमध्ये व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने थेट केंद्र सरकारला पत्र लिहून सदरचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे तर सरकारच्या या निर्णयाने निवडणुकीला सामोरे जाऊ पाहणाºया उमेदवारांनाही धडकी भरली आहे.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019onionकांदा