शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

येवला तालुक्यात पोळ कांदा लागवड उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:26 IST

येवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल। करपाचा प्रादुर्भाव; इतर पिकांकडे वळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रोपांची पांढरी मुळी बंद झाली आहे. दहा ते बारा दिवसांपासून ऊनही पडलेले नाही, परिणामी रोपे व लावलेले कांदे पिवळे पडत असल्याने जमिनीतून पूरक खते व बुरशीनाशक व वरून महागड्या बुरशीनाशकांची फवारणीही सुरू आहे. आज येवला तालुक्यातील प्रत्येक शेतकºयाला कांदा लागवड, कांदा रोप वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, लावलेला पोळ कांदा तग धरत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा लागवडीत नांगर घालण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकºयांनी पोळ कांद्यासाठी जमीन राखीव ठेवलेल्या आहेत; पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडून गेल्याने शेतकरी इतर पिके घेण्याची शक्यता आहे.रोपे सडल्याने व लागवड केलेला कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा यंदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मी अडीच एकर क्षेत्रावर आठ दिवसांपूर्वी कांदा लागवड केली; मात्र लागवडीनंतर वातावरणातील बदलामुळे कांदा आपोआप जमिनीत पिवळा पडून जळत आहे. आठव्या दिवशीच औषधे फवारणी करून कांदा वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणात खर्चर्ही होत आहे.- राजेंद्र थेटे, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा