शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येवला तालुक्यात पोळ कांदा लागवड उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:26 IST

येवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल। करपाचा प्रादुर्भाव; इतर पिकांकडे वळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रोपांची पांढरी मुळी बंद झाली आहे. दहा ते बारा दिवसांपासून ऊनही पडलेले नाही, परिणामी रोपे व लावलेले कांदे पिवळे पडत असल्याने जमिनीतून पूरक खते व बुरशीनाशक व वरून महागड्या बुरशीनाशकांची फवारणीही सुरू आहे. आज येवला तालुक्यातील प्रत्येक शेतकºयाला कांदा लागवड, कांदा रोप वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, लावलेला पोळ कांदा तग धरत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा लागवडीत नांगर घालण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकºयांनी पोळ कांद्यासाठी जमीन राखीव ठेवलेल्या आहेत; पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडून गेल्याने शेतकरी इतर पिके घेण्याची शक्यता आहे.रोपे सडल्याने व लागवड केलेला कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा यंदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मी अडीच एकर क्षेत्रावर आठ दिवसांपूर्वी कांदा लागवड केली; मात्र लागवडीनंतर वातावरणातील बदलामुळे कांदा आपोआप जमिनीत पिवळा पडून जळत आहे. आठव्या दिवशीच औषधे फवारणी करून कांदा वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणात खर्चर्ही होत आहे.- राजेंद्र थेटे, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा