शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात १५ जूनला कांदा परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 01:53 IST

उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जून रोजी येवल्यात कांदा परिषद घेण्यात येणार असून,यावेळी कांदा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय; आंदोलनाची दिशा ठरणार

नाशिक : उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जून रोजी येवल्यात कांदा परिषद घेण्यात येणार असून,यावेळी कांदा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

कांदा दरातील घसरण, जीवनाश्यक वस्तूंमध्ये कांद्याचा समावेश, नाफेडची कांदा खरेदी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी (दि. १५) हुतात्मा स्मारक येथे बैठक पार पडली. यावेळी कांदा दर घसरणीची कारणे, कांद्याचे उत्पादन व खर्च,कांदा निर्यात धोरण व दरवाढीसाठी आंदोलनाची दिशा ठरवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपापली मते मांडत राेष व्यक्त केला.

उन्हाळ कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर गत दोन महिन्यांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहे. सध्या मिळणाऱ्या आठशे ते हजार रुपयांच्या दरात कांदा परवडत नाही. त्यातच केंद्र सरकारने कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्याचाही परिणाम बाजारपेठेवर होत आहे. कांदा निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना इंधनावरील करात सवलत द्यावी, तसेच कांदा खरेदी ही जागतिक बाजारपेठेतील दरांप्रमाणे करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर कांदा आंदोलन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच येवल्यातील कांदा परिषदेत शेतकऱ्यांना अधिकाधिक संख्येने कसे सहभागी करून घेता येईल,याविषयी चर्चा झाली.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष ललित बहाळे,माजी आमदार वामनराव चटक, ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, देवीदास पवार, बापू पगार, संतू झामरे, आंबादास ढिकले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

-----------

केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट

उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळावे,आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती प्रमाणे कांद्यांची खरेदी व्हावी, यांसह विविध मागण्यांसाठी केंद्रीय कृषीमंत्री, वाणिज्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

 

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी