शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

येवल्यात १५ जूनला कांदा परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 01:53 IST

उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जून रोजी येवल्यात कांदा परिषद घेण्यात येणार असून,यावेळी कांदा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय; आंदोलनाची दिशा ठरणार

नाशिक : उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जून रोजी येवल्यात कांदा परिषद घेण्यात येणार असून,यावेळी कांदा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

कांदा दरातील घसरण, जीवनाश्यक वस्तूंमध्ये कांद्याचा समावेश, नाफेडची कांदा खरेदी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी (दि. १५) हुतात्मा स्मारक येथे बैठक पार पडली. यावेळी कांदा दर घसरणीची कारणे, कांद्याचे उत्पादन व खर्च,कांदा निर्यात धोरण व दरवाढीसाठी आंदोलनाची दिशा ठरवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपापली मते मांडत राेष व्यक्त केला.

उन्हाळ कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर गत दोन महिन्यांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहे. सध्या मिळणाऱ्या आठशे ते हजार रुपयांच्या दरात कांदा परवडत नाही. त्यातच केंद्र सरकारने कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्याचाही परिणाम बाजारपेठेवर होत आहे. कांदा निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना इंधनावरील करात सवलत द्यावी, तसेच कांदा खरेदी ही जागतिक बाजारपेठेतील दरांप्रमाणे करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर कांदा आंदोलन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच येवल्यातील कांदा परिषदेत शेतकऱ्यांना अधिकाधिक संख्येने कसे सहभागी करून घेता येईल,याविषयी चर्चा झाली.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष ललित बहाळे,माजी आमदार वामनराव चटक, ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, देवीदास पवार, बापू पगार, संतू झामरे, आंबादास ढिकले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

-----------

केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट

उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळावे,आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती प्रमाणे कांद्यांची खरेदी व्हावी, यांसह विविध मागण्यांसाठी केंद्रीय कृषीमंत्री, वाणिज्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

 

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी