शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

२५ दिवसानंतर नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू, ५५० कोटींचे नुकसान; इतर मालाचीही आवक सुरू

By दिनेश पाठक | Updated: April 22, 2024 17:31 IST

सकाळपासून बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन आलेले ट्रॅक्टर लिलावासाठी रांगेत उभे होते. पहिल्या दिवशी कांद्याला कमीतकमी ११०१ ते सरासरी १३६० चा भाव मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक (दिनेश पाठक): २५ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होते. सहकार विभागाने दिलेला कारवाईचा इशारा, व्यापारी, बाजार समित्या व काही हमाल मापारींनी घेतलेली सकारात्मक  भूमिका यामुळे सोमवारपासून (दि.२२) मनमाड व नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता जिल्ह्यातील इतर सर्व १३ बाजार समित्या व उप बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले. त्यामुळे कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. सकाळपासून बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन आलेले ट्रॅक्टर लिलावासाठी रांगेत उभे होते. पहिल्या दिवशी कांद्याला कमीतकमी ११०१ ते सरासरी १३६० चा भाव मिळाला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र कांदा व इतर मालाची लिलाव प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे या बाजार समितीत नुकसान झाले नसले तरी इतर १४  बाजार समित्यांत मात्र कोट्यवधीचे नुकसान झाले.  त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. पहिल्या १५ दिवसांत ५०० कोटींचे नुकसान झाले हाेते. नंतर हा आकडा ५० ते ६० कोटींनी अजून वाढला. लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिल्याने बाजार समित्या बंद होत्या. शेतकऱ्यांच्या पावतीमधून कपात केलेले माथाडी कामगारांचे १३६ कोटी रुपये लेव्ही २००८ पासून व्यापाऱ्यांकडे थकले आहेत. ही रक्कम जमा करण्यास व्यापारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून हमाल मापारी करीत आहेत. याच प्रश्नावरून व्यापाऱ्यांनी २५ दिवसांपासून लिलाव बंद ठेवले होते. कांदा काढणीचे काम वेगात सुरू असताना  कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते.

हमाली, ताेलाई कपात न करताच लिलाव

हमाल, मापाऱ्यांनी विरोध करूनही व्यापाऱ्यांनी मात्र हमाली, ताेलाई कपात न करताच लिलाव सुरू केले.  त्यामुळे  कामगार व  हमाल संतप्त झाले. परिणामी ४०  टक्के कामगार, हमाल कामावर हजर  झालेच नाही. परंतू  आहे त्या हमालाच्या भरवशावर  लिलाव सुरू झाले. फक्त लासलगाव येथेच प्रचलित (जुन्या) पद्धतीने लिलाव सुरू झाल्याची  माहिती सहकार  विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा